उल्हासनगर : उल्हासनगरात पती पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून या दाम्पत्याची दोन मुलं मात्र या घटनेनं पोरकी झाली आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी पंढरपूरला देव दर्शन घेत आई वडिलांची भेट घेतली होती, अशी माहिती समोर आली आहे.