AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयआयटी बॉम्बे आत्महत्या प्रकरण, विशेष तपास पथकाचे न्यायालयात धक्कादायक खुलासे

बहुचर्चित पवई आयआयटीतील दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरणी एसआयटी टीमकडून अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यामुळे आरोपी अरमान खत्रीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आयआयटी बॉम्बे आत्महत्या प्रकरण, विशेष तपास पथकाचे न्यायालयात धक्कादायक खुलासे
पवई आयआयटी आत्महत्या प्रकरणी धक्कादायक खुलासाImage Credit source: TV9
| Updated on: May 31, 2023 | 10:47 AM
Share

मुंबई : मुंबईसह संपूर्ण देशभरात गाजलेल्या पवई आयआयटीतील दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याच्या आत्महत्या प्रकरणात विशेष तपास पथकाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. दर्शनला अरमान खत्रीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा दावा आरोपपत्रात करण्यात आला आहे. एसआयटीने हा दावा आणि विविध खुलासे असलेल्या 483 पानांचे आरोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले आहेत. अरमानने दर्शनला ‘बॉम्बे छोडके जाके देखा, मैं वहा पहुचुंगा’, अशी धमकी दिल्याचे एसआयटीने आरोपपत्रात नमूद केले आहे. या आरोपपत्रात तब्बल 55 साक्षीदारांचा समावेश असून, त्यात दर्शनसोबत शिक्षण घेणाऱ्या 14 सहकारी विद्यार्थ्यांच्या जबाबाचाही समावेश आहे. या आरोपपत्रामुळे अरमान खत्री मोठ्या अडचणीत सापडला आहे.

दर्शनने सहकारी विद्यार्थ्यांकडे व्यक्त केली होती भिती

एसआयटीने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, दर्शन सोलंकी याने आयआयटी बॉम्बेमधील आपल्या सहकारी विद्यार्थ्यांना सांगितले होते की, ‘तो कुठेही गेला तरी अरमान खत्री त्याला ठार मारेल’. खत्री याच्या विरोधात केलेल्या कथित जातीय टिप्पणीबद्दल माफी मागून, सोलंकी याने त्याला एक मॅसेज दिला होता, की मी मुंबई सोडत आहे.

काय होते व्हॉट्सअप मॅसेजमध्ये?

याप्रकरणी 14 विद्यार्थ्यांसह 55 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात आठव्या मजल्यावर राहणाऱ्या सात प्राध्यापकांचाही समावेश आहे. आरोपपत्रानुसार, 10 फेब्रुवारी रोजी दर्शनने अरमानला व्हॉट्सअॅपवर एक मॅसेज पाठवला, “हाय, अरमान मै बॉम्बे छोड़ के जा रहा हू… (मी मुंबई सोडत आहे).” “प्रत्युत्तरादाखल अरमानने त्याला सांगितले, ‘तू बॉम्बे छोड़के जा के देखा, मैं वहॉ पहूचुंगा’.

दर्शनने सातव्या मजल्यावरुन उडी घेत जीवन संपवले

दर्शन सोलंकी याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) तीन महिन्यांच्या तपासानंतर आरोपपत्र दाखल केले. IIT-Bombay मधील BTech च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने 12 फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली होती. जातिभेदामुळे त्याला स्वतःचा जीव घेण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्या कुटुंबीयांचा आरोप केला होता. यानंतर पोलीस तपासात दर्शन त्याचा कॉलेजमधील सिनियर अरमानला घाबरत असल्याचे उघड झाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.