Maharashtra News LIVE Updates: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीनंतर एमएसआरडीसीला जाग
Maharashtra News LIVE Updates: . अपघात टाळण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर समितीची स्थापना करण्यात आली आहे. भिवंडी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढविणाऱ्या भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली आहे. अशात महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या...

LIVE NEWS & UPDATES
-
आपत्तीग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी
आपत्तीग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी.. उच्च आणि तंत्र शिक्षण मंडळाचा निर्णय.. दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या तालुक्यातील अकृषी विद्यापीठांसह, सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फायदा होणार..
-
शिष्यवृत्ती परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ.. 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार..
-
-
राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता
राज्यातील वीज ग्राहकांना दरवाढीचा धक्का बसण्याची शक्यता.. महावितरण कंपनीकडून राज्य वीज नियामक आयोगाकडे 20 ते 40 टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर.. यासंदर्भात नागपूरमध्ये जनसुनावणी..
-
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ.. खडकी- हिसार, दौंड – अजमेर आणि सोलापूर – अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश.. रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार..
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांचा जनगणनेच्या कामाला विरोध
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांचा जनगणनेच्या कामाला विरोध.. विद्यापीठातील 23 अनुदानित विभागातील 82 प्राध्यापकांना जनगणनेचे काम देण्यात आल्याची माहिती.. मनुष्यबळ कमी असल्याने काम न देण्याची मागणी..
-
-
उन्हाळ्याची चाहूल; तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी ग्रीन नेटची सुविधा
हिवाळा ओसरत असताना वाढत्या उन्हाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून भाविकांच्या सोयीसाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरातील प्रवेश मार्ग आणि रांगेच्या ठिकाणी ग्रीन नेट बसविण्यात आले आहे. या सुविधेमुळे थेट सूर्यकिरणांचा प्रभाव कमी होऊन भाविकांना उन्हापासून दिलासा मिळत आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत वाढणारी गर्दी लक्षात घेऊन संस्थानने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
-
पुण्यात राज ठाकरेंनी घेतली प्रमुख पदाधिकारी आणि पराभूत उमेदवाराची बैठक
राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना झापले आहे. पुण्यात झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज आहेत. सांगितलेल्या गोष्टी न केल्याने राज ठाकरे नाराज झाल्याची माहिती समोर येत आहे. या पुढे दर आठवड्याला राज ठाकरे स्वत: पुणे मनसेचा आढावा घेणार. तसेच पराभवातून बाहेर पडत कामाला लागण्याच्या देखील सूचना दिल्या. येणाऱ्या काळात काम करत रहा कुठे ही कमी पडू नका… पुण्यात प्रत्येक घरापर्यंत पोहोचा… अशा ही सूचना राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीत दिल्या आहेत.
-
-
भटाळा दर्शनावरून परत येताना शिवभक्तांचा वाहन पलटी, एक ठार, १७ प्रवासी जखमी
शिवभक्तांचा दर्शनावरून परत येताना वाहन पलटी झाल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला तर १७ प्रवासी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पाटाळा जवळील घडली. १२ जण गंभीर तर ५ जण किरकोळ जखमी झाले आहेत. पाटाळा परिसरातील शिवभक्त मालवाहक वाहनातून भटाळा येथे त्रिशूल घेऊन दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परत येत असताना हे सर्वजण पाटाळा जवळील राळेगाव येथील जगन्नाथ मठावर दर्शनासाठी जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते पलटी झाले.
-
शिष्यवृत्ती परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता 28 फेब्रुवारी पर्यंत शाळा नोंदणीसह विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
-
अमरावती जिल्ह्यात होळीच्या तोंडावर 50 हजार मेळघाटातील आदिवासी मजूर संकटात
अमरावती जिल्ह्यात होळीच्या तोंडावर 50 हजार मेळघाटातील आदिवासी मजूर संकटात सापडले आहेत. दोन महिन्यांपासून मजुरी न मिळाल्याने आदिवासी मजुरांमध्ये संताप वाढला. अमरावती जिल्ह्याची तब्बल 35 कोटी 7 लाखांची मजुरी रखडली. मेळघाटातच 22 कोटी 28 लाख रुपये थकीत.चिखलदरा व धारणी तालुक्यातील मजूर सर्वाधिक प्रभावित आहेत. होळी सण जवळ, पण मजुरांच्या हातात पैसे नाहीत. प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहेत.
-
जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारांचा सन्मान
जिल्हा परिषद निवडणुकीतील विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून उमेदवारांचा सन्मान करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत निवडणूक आल्यानंतर जिल्हाप्रमुख चरणराज चवरेंचा सत्कार केला आहे. ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी चरणराज चवरे यांच्यावर पालखी महामार्गात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता, मात्र या आरोपांनंतरही जिल्हाप्रमुख चरणराज चवरे हे निवडून आलेत. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदाचा वापर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करण्याचा कानमंत्र दिला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीनंतर एमएसआरडीसीला जाग आली आहे. अपघात टाळण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. सात जणांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. महामार्गावरील अपघात कसे रोखता येतील आणि सुखकर प्रवास कसा करता येईल याचा समिती अभ्यास करणार. भिवंडी पालिका निवडणुका महायुती म्हणून लढविणाऱ्या भाजपा व शिवसेना यांच्यामध्ये फूट पडली आहे. भाजपा पाठोपाठ शिवसेना सुद्धा महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक लढवणार आहे. अशी घोषणा पक्षनेते प्रकाश पाटील यांनी केली आाहे. उन्हाळ्याची सुद्धा चाहून लागली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेत वाढ करण्यात आली. रेल्वे प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीत वाढती गर्दी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी पुण्याहून धावणाऱ्या रेल्वेच्या सेवेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यात खडकी- हिसार,दौंड – अजमेर सोलापूर – अजमेर या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे… राज्यातील इतर प्रमुख घडामोडींची अपडेट इथं पाहा…
Published On - Feb 16,2026 8:20 AM
