AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कार अपघातात जागीच चार जण ठार; वाशिम-शेलुबाजार मार्गावर अपघात, लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक

नागपुरहून लग्न् आटोपून घरी परतत असताना वाशिम-शेलुबाजार मार्गावर सोयता फाट्याजवळ कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला.  उभा असलेल्या ट्रक्टरला कारने धडक दिल्याने या अपघातात चार जण जागीच ठार झाले.

कार अपघातात जागीच चार जण ठार; वाशिम-शेलुबाजार मार्गावर अपघात, लग्न आटोपून परतताना कारची ट्रॅक्टरला धडक
| Edited By: महादेव कांबळे | Updated on: Feb 15, 2022 | 11:40 PM
Share

वाशिम: नागपुरहून लग्न् आटोपून घरी परतत असताना वाशिम-शेलुबाजार मार्गावर सोयता फाट्याजवळ कार आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला.  उभा असलेल्या ट्रक्टरला कारने (Car) धडक दिल्याने या अपघातात (Accident) चार जण जागीच ठार (Death) झाले. तर नऊ जण जखमी झाले आहेत. या अपघाताची पोलिसात तक्रार नोंद झाली असून पुढील तपास सुरु आहे. हा अपघात इतका भीषण होता की, उभा असलेल्या ट्रॅक्टरला कारने जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला होता. कारची ट्रॅक्टरला धडक बसताच जागेवर चौघांचा मृत्यू झाल्याने अनेक जणांना याचा धक्का बसला. अपघातातील जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले. अपघातातील सर्व जण वाशिम जिल्ह्यातील सावंगा जहागीर येथील आहेत

वाशिम शेलूबाजार मार्गावर झालेल्या अपघातात दोन मुले, एक महिला आणि पुरूष मंडळी होती. हे सर्वजण त्यांच्या परिचयातील नातेवाईकांच्या लग्नासाठी गेले होते. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. या झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत होती.

थांबलेल्या ट्रॅक्टरला कारची जोरदार धडक

नागपूरहून लग्न करून परतत असताना हा सोयता फाट्याजवळ हा अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टरला कारने जोरदार धडक दिल्यामुळे कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. जखमींनी पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पोलिसात झाली आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलीस घेत आहेत. कारमधील चौघेजण जागीच ठार झाल्याने अपघातानंतरची झालेली परिस्थिती विदारक होती.

सध्या रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातात अनेकांचा हाकनाक बळी जात आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था पोलिसांकडून वारंवार सूचना देऊनही कारचालक आणि इतर चालक, वाहक या सूचनांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे राज्यमार्ग अथवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस यंत्रणा करत असते.

संबंधित बातम्या

पंजाबी अभिनेता दीप सिद्धूचा कार अपघातात मृत्यू; किसान आंदोलनामुळे आला होता चर्चेत

अहमदनगरमध्ये 6 गावठी कट्टे, 12 जिवंत काडतुसे जप्त; दोघेजण ताब्यात; गावठी कट्टे वापरणाऱ्यांचा शोध सुरू

हातावर मोबाइल नंबर, प्रकृती खंगलेली, जालन्यातील गायब एसीबीचे पोलिस सापडले, पण गूढ आणखी वाढलं

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.