AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kalyan Ransom : नवरा पाहिजेल तर पाच लाख दे, पत्नीकडून खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

डोंबिवलीत राहणारे अतुल व्यापारी हे बँकेतून कर्ज पास करून देणे, व्याजाने पैसे देणे यांसारखे व्यवहार करतात. रेल्वे मध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या अजयने 2021 मध्ये अतुल यांच्यासोबत एक व्यवहार केला होता.

Kalyan Ransom : नवरा पाहिजेल तर पाच लाख दे, पत्नीकडून खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
ठेकेदाराचे अपहरण करत खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटकImage Credit source: tv9
| Updated on: Jul 18, 2022 | 1:06 AM
Share

डोंबिवली : पैसे परत करत नसल्याने एका व्यक्तीला डांबून ठेवत त्याच्या पत्नीकडे 5 लाख रुपयाची खंडणी (Ransom) मागणाऱ्या खंडणीखोराला डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. अतुल व्यापारी असे सुटका करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अजय जाधव असे खंडणी मागणाऱ्या आरोपीचे नाव आहे. एका व्यवहारात अजयने दिलेले 2 लाख 80 हजार रुपये अतुल व्यापारी हे परत करत नसल्याने त्यांचे अपहरण (Kidnapping) करुन मारहाण केली. अजय जाधव हा रेल्वेत मॅकेनिक आहे. खंडणी मागितल्याप्रकरणी व्यापारी यांच्या पत्नीने टिळक नगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी मागणाऱ्या आरोपीला रंगेहाथ पकडून अतुल यांची सुखरूप सुटका केली आहे.

अपहरण करुन रेल्वे वसाहतीतील डांबले

आरोपीने व्यापारी यांचे अपहरण करून त्यांना 8 दिवस स्वतःच्या माटुंगा येथील रेल्वे कॉलनीतील घरात डांबून ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी पत्नीकडे 5 लाख रुपयांची खंडणी मागितली. डोंबिवलीत राहणारे अतुल व्यापारी हे बँकेतून कर्ज पास करून देणे, व्याजाने पैसे देणे यांसारखे व्यवहार करतात. रेल्वे मध्ये मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या अजयने 2021 मध्ये अतुल यांच्यासोबत एक व्यवहार केला होता. त्यासाठी 2 लाख 80 हजार रुपये त्याने अतुलला दिले होते. मात्र पैसे परत देत नसल्याने अजय याने अतुल डोंबिवलीत 9 जुलै रोजी भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांचे अपहरण करत त्यांना माटुंगा येथील रेल्वे वसाहतीतील घरात डांबून ठेवले. पुढे अतुल यांची पत्नी ऋचा यांच्या फोनवर नवरा हवा तर 5 लाख रुपये दे अशी मागणी केली. ऋचा यांनी 3 लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. मात्र अजय 5 लाखावर अडून बसल्याने अखेर शुक्रवारी तिने टिळकनगर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली.

खंडणीचे पैसे घेताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

तक्रार दाखल होताच टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे, पोलीस नाईक जाधव, घुगे, महाजन, चंदने यांच्या पथकाने अतुल यांचा शोध सुरू केला. ऋचा यांनी 5 लाख घेण्यासाठी अजयला डोंबिवली पूर्वेतील फडके रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. या हॉटेलात पोलिसांनी सापळा लावत खंडणीचे पैसे घेत असलेल्या अजयला रंगेहाथ पकडून अतुलची सुटका केली. त्यानंतर पत्नीच्या व अतुलच्या फिर्यादीनंतर अजयला बेड्या ठोकत कल्याण सत्र न्यायालयात हजर केले. रविवारी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने अजयला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. (Police arrested the accused who kidnapped the husband and demanded ransom from the wife)

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.