AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गर्लफ्रेंडशी फाटलं, प्रेमसंबंधात आला दुरावा, रागात अल्पवयीन मुलाने तरूणाचा काटाच काढला

सौरभ आठवले याने मांगडेवाडीतील एका अल्पवयीन मुलीला बहिण मानले होते. मुलीच्या घरच्यांची सौरभ याचे घरगुती संबंध प्रस्थापित झाल्याने, तीला शाळेत आणणे- सोडण्याचे कामं सौरभ करत असे. मात्र त्याच मुलीशी आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाचे प्रेमसंबंध होते. हे प्रकरण सौरभला कळल्यानंतर त्याने जे केलं ते थेट त्याच्या जीवावरच बेतलं.

गर्लफ्रेंडशी फाटलं, प्रेमसंबंधात आला दुरावा, रागात अल्पवयीन मुलाने तरूणाचा काटाच काढला
पुणे क्राईम न्यूज
| Updated on: Aug 23, 2025 | 11:36 AM
Share

राज्यामध्ये सध्या गुन्ह्यांच्या अनेक घटना उघडकीस येत असून विद्येचं माहेर म्हटल्या जाणाऱ्या पुण्यातही अनेक गुन्हे घडल्याचे समोर येत आहे. पुण्यातील कात्रजच्या बोगद्याजवळ झालेल्या एका खुनामुळेही मोठी खळबळ माजली होती. तेथे एका युवकाचा खून करून मृतदेह टाकून देण्यात आला होता. मात्र राजगड पोलिसांनी अवघ्या 12 तासांत या खुनाचा उलगडा करत आरोपींचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.

नेमकं काय झालं ?

पुण्यातील भोरच्या राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी (ता. भोर) परिसरात जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडील डोंगरावर 19 ऑगस्ट रोजी सकाळी एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती.

राजगड पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाची सूत्रे हाती घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनीही तपासाची जबाबदारी घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. चौकशीत मृताची ओळख सौरभ स्वामी आठवले (वय २५, रा. मांगडेवाडी, पुणे, मूळ सोलापूर) अशी पटली होती. त्याच्या नातेवाईकांनी एक दिवस आधीच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती.

त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजगड पोलिसांनी तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फूटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने वेगाने तपास सुरू केला. तपासादम्यान डी. बी. पथकातील पो.शि. अक्षय नलावडे यांच्या समोर धक्कादायक माहिती आली की, एक अल्पवयीन बालक आणि त्याच्या साथीदारांनीच सौरभचा खून केला आहे. यांनतर पोलिसांनी सापळा रचून श्रीमंत अनिल गुन्जे (वय २१, रा. खंडोबा मंदीर जवळ, वडगाव मावळ), संगम नामदेव क्षीरसागर (वय १९, रा. ढोले वाडा, वडगाव मावळ), नितीन त्र्यंबक शिंदे (वय १८ वर्षे, रा. गोकुळनगर कात्रज) तसेच दोन अल्पवयीन मुलांना अवघ्या 12 तासात ताब्यात घेतले.

प्रेमसंबंधात दुरावा आल्याने जीवच घेतला

सौरभ आठवले याने मांगडेवाडीतील एका अल्पवयीन मुलीला बहिण मानले होते. मुलीच्या घरच्यांची सौरभ याचे घरगुती संबंध प्रस्थापित झाल्याने, तीला शाळेत आणणे- सोडण्याचे कामं सौरभ करत असे. मात्र त्याच मुलीशी आरोपींपैकी एका अल्पवयीन मुलाचे प्रेमसंबंध होते. हे प्रकरण सौरभला कळल्यानंतर त्यानी हे मुलीच्या कुटुंबीयांना सांगितले. यानंतर संबंधित मुलाला तो राहत असलेल्या मुली शेजारच आत्याचे घर सोडून, त्याच्या वडिलांनी त्याला पुन्हा वडगाव मावळ येथील त्याच्या वडिलांच्या घरी बोलवले. त्यामुळे प्रेमसंबंधात आलेल्या दुराव्याचा राग मनात धरून त्याने मित्रांच्या मदतीने सौरभचा खून करण्याचा कट रचला. सौरभला बोलावून डोंगरात नेण्यात आले आणि कोयत्याने आणि इतर हत्यारांनी वार करून त्याचा खून करण्यात आला.

संशयित आरोपींकडून ॲक्टिव्हा, स्प्लेंडर मोटारसायकल आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. काळ्या रंगाची मोटारसायकलही हस्तगत करण्यात आली असून महत्त्वाचे तांत्रिक पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. अटक संशयित आरोपींना भोर न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश गवळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील, उपनिरीक्षक वृषाली देसाई तसेच अंमलदार सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुन कोल्हे, अजित माने, निलेश राणे, अमोल तळपे, अनिल मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भडाळे, मंगेश कुंभार यांच्या पथकाने केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.