AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने घरी मेसेज केले अन् धरणात घेतली उडी

करण दीक्षित याचा मृतदेह धरणातून काढल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याने धरणात उडी मारुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. करण दीक्षित हा पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाने घरी मेसेज केले अन् धरणात घेतली उडी
अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या तरुणाने धरणात उडी मारली
| Updated on: Apr 17, 2025 | 7:48 AM
Share

Pune Crime: पुण्यातील राजगड तालुक्यातील कानंद गावाच्या हद्दीत गुंजवणी धरणात उडी मारुन पुण्यातील महाविद्यालयीन तरुणाने जीवन संपवल्याची घटना घडली. हा तरुण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. करण शंकर दीक्षित ( वय २४, रा. धनकवडी, पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आत्महत्या करण्याआधी त्याने नातेवाईकांना मोबाईलवर मेसेज पाठवला होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याचा शोध सुरु केला. चार तासांच्या शोधमोहिमेनंतर वेल्हे पोलिसांनी हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या रेक्सु पथकाच्या मदतीने करण याचा मृतदेह धरणातील खोल पाण्यातून बाहेर काढला.

करण दीक्षित याचा मृतदेह धरणातून काढल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्याने धरणात उडी मारुन आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे. करण दीक्षित हा पुण्यातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकत होता. मंगळवारी 15 एप्रिलला तो घरातून दुचाकी गाडीवरून निघून आला. त्याने घरातील नातेवाईकांना मी आत्महत्या करत आहे, असा मेसेज मोबाईलवर पाठवला होता. त्यामुळे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. या बाबत नातेवाईकांनी पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात करण हा बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल केली होती.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास वेल्हे पोलिसांना एका तरुणाने गुंजवणी धरणात उडी मारली असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वेल्हे पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रसाद मांडके आणि हवालदार युवराज सुर्यवंशी यांनी हवेली तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे रेक्सु पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रेक्सू पथकाचे प्रमुख तानाजी भोसले, गणेश सपकाळ, संजय चोरघे, संदीप सोलस्कर, निलेश जाधव तसेच कानंदचे पोलीस पाटील संजय कडू यांनी धरणात उतरून शोध कार्य सुरू केले. चार तासानंतर दुपारी चार वाजण्याच्या खोल पाण्यातून करण याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

खोल पाणी असल्याने मृतदेह शोधण्यासाठी रेक्सू पथकाला मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह वेल्हे येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. धरणाच्या काठावर मयत करण दीक्षित याचे कपडे, मोबाईल फोन, दुचाकी गाडीची चावी, चप्पल त्याचा मृतदेह आढळला. करण याने शेवटचा फोन सकाळी ७ वाजून पन्नास मिनिटांनी केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे त्याने या नंतर कपडे, मोबाईल काढून धरणात उडी मारली असावी, असा अंदाज आहे.

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.