AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kishor Aware : किशोर आवारे यांच्या हत्येचा कट पाच महिन्यापूर्वीच रचला, रेकीही केली; आरोपी पोपटासारखे बोलले

सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणातील वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली आहे. आवारे यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. पण तो फसला होता, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे.

Kishor Aware : किशोर आवारे यांच्या हत्येचा कट पाच महिन्यापूर्वीच रचला, रेकीही केली; आरोपी पोपटासारखे बोलले
Kishor Aware Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2023 | 2:42 PM
Share

पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. भर दुपारी आवारे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर आरोपी पसार झाले. हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने हल्ला केला त्यामुळे पोलिसांसमोरही आव्हान निर्माण झाले. पण पोलिसांनी 24 तासात सूत्रे फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर त्यांना आपला खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखे बोलले. आरोपींनी आवारे यांच्या हत्येचा पूर्ण प्लॅनच पोलिसांसमोर उघड केला. त्यामुळे हत्येचं खरं कारण उघडकीस आलं.

किशोर आवारे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी रघु धोत्रे, आदेश धोत्रे, श्याम निगडकर आणि संदीप मोरे या आरोपींना अटक केली. वडगाव मावळ न्यायालयाने या चौघांनाही आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या आरोपींची कसून चौकशी केली. त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली. पोलिसांनी आरोपींच्या जबाबानुसार नगरसेवक भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदेला अटक केली आहे. गौरवच या हत्याकांडाचा मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं आहे.

मैत्री खातर हत्या

गौरव खळदे हा सिव्हिल इंजीनिअर होता. तोच स्वतःचा बांधकाम व्यवसाय सांभाळायचा. गौरव खळदेची आणि हत्या करणारा शाम निगडकर यांची मैत्री होती. गौरव खळदे हा शामला वेळोवेळी आर्थिक मदत करत होता. याचं मैत्रीखातर शाम निगडकर आणि त्याच्या साथीदारांकडून किशोर आवारे यांची हत्या करण्यात आली. यासाठी जानेवारीपासून किशोर आवारे याच्या हत्येचा कट रचण्यात येत होता. तर गेल्या महिन्याभरा पासून हे आरोपी रेकी करत होते. अखेर नगरपरिषदेच्या कार्यालयातच आवारे यांना मारेकऱ्यांनी गाठलं आणि त्यांची हत्या केली.

आधीही हत्येचा प्रयत्न

शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची मार्च महिन्यात हत्या झाली. त्यावेळी किशोर आवारे हे वडगांव मावळ कोर्टात गेले होते. त्यावेळी देखील या आरोपींनी त्यांना मारण्याचा कट केला. मात्र गर्दी जास्त वाढल्यानं हा कट फसला आणि दोन दिवसांपूर्वीच ही हत्या झाली, अशी माहिती आता समोर येत आहे.

बदला घेण्यासाठी हत्या

किशोर आवारे यांनी माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार केली होती. आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे ही तक्रार केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती असा दावा भानू खळदे यांनी केला होता. यावरून खळदे आणि आवारे यांच्यात खडाजंगी झाली. यावेळी आवारे यांनी खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदेने हत्येचा कट रचला, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे एसीपी पद्माकर घनवट यांनी दिली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.