AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्याण स्टेशनवर राडा, सुट्ट्या पैशांच्या वादावरून रेल्वे स्टाफची प्रवाशाला बेदम मारहाण

पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर नेहमी परिणाम होत असतो. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, त्यातच लोकलच गर्दी, चेंगराचेंगरी यामुळेदेखील प्रवासी हवालदिल झालेले असतात. पण आता हे सर्व कमी की काय म्हणून प्रवाशांना चक्क रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्टेशनवर ही खळबळजनक घटना घडली अ

कल्याण स्टेशनवर राडा, सुट्ट्या पैशांच्या वादावरून रेल्वे स्टाफची प्रवाशाला बेदम मारहाण
रेल्वे स्टाफची प्रवाशाला मारहाण Image Credit source:
| Updated on: Aug 05, 2024 | 9:30 AM
Share

पावसामुळे मध्य रेल्वेच्या लोकल सेवेवर नेहमी परिणाम होत असतो. त्यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो, त्यातच लोकलच गर्दी, चेंगराचेंगरी यामुळेदेखील प्रवासी हवालदिल झालेले असतात. पण आता हे सर्व कमी की काय म्हणून प्रवाशांना चक्क रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मध्य रेल्वेवरील महत्वाचे स्थानक असलेल्या कल्याण स्टेशनवर ही खळबळजनक घटना घडली असून तिकीट काऊंटरवरील महिला स्टाफने चक्क एक महिलाल प्रवाशाला स्टंपने मारहाण केल्याचा अतिशय खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला असून संबंधित प्रवासी महिला जखमी झाली आहे.

सुट्ट्या पैशांच्या शुल्लक मुद्यावरून झालेल्या वादाला एवढे भयानक वळण लागेल याची कोणीही कल्पनाच केली नव्हती. यामध्ये संबंधित प्रवासी महिला जखमी झाली असून मारहाणाीमुळे तिला मोठा मानसिक धक्काही बसला आहे. य़ा खळबळजनक घटनेटा व्हि़डीओ देखील समोर आला असून स्टाफमधील ती महिला अरेरावी करत वाद घालत असल्याचेही त्यात दिसत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित स्टाफवर वेळीच कारवाई करावी आणि कर्मचाऱ्यांना नीट वागण्याची सूचना द्यावी अन्यथा एकेदिवशी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक झाल्यास परिस्थिती चिघळेल, असा इशारा प्रवाशांकडून देण्यात येत आहे.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार, आज ( सोमवार) सकाळी कल्याण स्टेशनवर हा प्रकार घडला. स्टेशनट्या सात नंबर प्लॅटफॉर्मवरील स्कायवॉकवर जे तिकीट काऊंटर आहे, तेथे हा वाद आणि मारामारी घडली. पीडित महिला तिकीटाच्या लाईनीत उभी होती. सुट्ट्या पैशांच्या मुद्यावरून तिचे तिकीट काऊंटरवीरल स्टाफशी भांडण झाले.

बघता बघता त्याचा वांद वाढला, त्यावेळी त्या प्रवासी महिलेने स्टाफचा व्हि़डीओ काढण्यास सुरूवात केली. त्यामुळे ती आणखीनच भडकली. आणि तिने त्या महिलेला आत ऑफीसमध्ये बोलावले आणि तिला चक्क मारहाण केली. तिला कानाखाली मारली. ते पाहून इतर प्रवाशांनी मध्यस्थी करत, आरडाओरडा करत त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही स्टाफमधील त्या महिला कर्मचाऱ्याने मारहाण सुरूच ठेवली. यामध्ये ती महिला प्रवासी गंभीर जखमी झाली तसेच तिला मोठा मानसिक धक्काही बसला.

प्रवासी आक्रमक

अखेर इतर प्रवाशांनी स्टाफच्या हातातून कशीबशी त्या महिलेची सुटका केली. तेवढ्यात तेथे रेल्वे पोलिस अधिकारी आले आणि त्यांनी प्रकरण समजून घेत मध्यस्थी केली. तब्बल अर्ध्या तासाच्या गोंधळानंतर रेल्वे पोलिसांच्या मदतीने प्रवासी व तिकीट काउंटरवरील स्टाफचा वाद मिटला. मात्र प्रवाशांना नेहमीच रेल्वे स्टाफकडून अशी वाईट वागणूक मिळते, असा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे. रेल्वे स्टाफला वेळीच समज द्यावी अन्यथा एखाद दिवस प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाऊन चिघळेल असा इशारा उद्विग्न प्रवाशांनी दिला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.