AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | पोलीस वसुली करतात का? हो, पण मग पैसा जातो कुठे? IPS संजय पांडेंनी आमीर खानला काय सांगितलं?

'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये बिघडलेली व्यवस्था या थीम अंतर्गत पोलिस यंत्रणेविषयी अनेक खुलासे करण्यात आले (Sanjay Pandey Aamir Khan)

VIDEO | पोलीस वसुली करतात का? हो, पण मग पैसा जातो कुठे? IPS संजय पांडेंनी आमीर खानला काय सांगितलं?
(डावीकडे) संजय पांडे, आमीर खान
| Updated on: Mar 23, 2021 | 9:29 AM
Share

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी नुकताच गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर लेटरबॉम्ब टाकला. अटकेत असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना शंभर कोटींच्या वसुलीचं टार्गेट देशमुखांनी दिल्याचा आरोप सिंहांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर आयपीएस अधिकारी संजय पांडे (Sanjay Pandey) यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘सत्यमेव जयते’ (Satyamev Jayate) या शोमध्ये सूत्रसंचालक आणि अभिनेता आमीर खानला (Aamir Khan) पांडेंनी वसुलीचं गणित सांगितलं होतं. (Satyamev Jayate IPS Officer Sanjay Pandey had told Aamir Khan about broken system in Police Force)

‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये बिघडलेली व्यवस्था या थीम अंतर्गत पोलिस यंत्रणेविषयी अनेक खुलासे करण्यात आले. 8 ऑगस्ट 2016 रोजी हा एपिसोड टेलिकास्ट झाला होता.

काय म्हणाले होते संजय पांडे?

आमीर खान : जनतेचा दृष्टीकोन आहे, की पोलीस किंवा हवालदार आमच्याकडून रस्त्यावर पैसे म्हणजे लाच घेतात. सामान्य माणूस असो, रिक्षावाला असो किंवा बस… मी बरोबर बोलतोय का? (टाळ्यांचा कडकडाट) तर तो (पोलीस) कमी कमवतोय, पण आमच्याकडून तर खूप वसूल करतोय. मग त्याचं उत्पन्न चांगलंच असणार…

संजय पांडे : उत्पन्न त्या माणसापर्यंतच सीमित राहत असतं, तर मी मान्य केलं असतं. ही सगळी रक्कम तो गोळा करुन घरी घेऊन जात असेल, यावर माझा विश्वास नाही.

आमीर खान : मग हा पैसा जातो कुठे?

संजय पांडे : आपण लोकशाहीत आहोत. प्रत्येकाचे वरिष्ठ असतात, त्यांचे वरिष्ठ असतात. राजकीय नेते असतात.. ही एक साखळी आहे.

आमीर खान : दुकानदारांकडून मिळालेले हफ्ते, पैसे कुठेतरी अन्यत्र वाटले जातात का? (Satyamev Jayate IPS Officer Sanjay Pandey had told Aamir Khan about broken system in Police Force)

संजय पांडे : सर्वसामान्यांच्या भाषेत सांगायचं तर इथे दोन प्रकार आहेत… एक म्हणजे असंघटित (disorganised) यंत्रणा.. रस्त्यात चालताना कोणी दिसलं.. विचारलं, की परवाना आहे का? नाही.. मग काहीतरी अॅडजस्ट करु.. म्हणजे किती जण पकडले जातील माहिती नाही, आज दहा मिळतील, उद्या पन्नास..

दुसरी आहे संघटित यंत्रणा. काही रेस्टॉरंट, लिकर बार, डान्स बार आहेत… महाराष्ट्रात तर त्यांच्यावर बंदीही आहे. यांच्याकडून वसुलीची व्यवस्थित यंत्रणा राबवली जाते. याचं अंदाजपत्रक तयार असतं. आपल्याकडे इतके रेस्टॉरंट आहेत, तर इतके पैसे येणार. जसं तुमचा स्टुडिओ रात्री चालू ठेवला. तर तुम्हाला द्यावे लागणार.

पाहा व्हिडीओ : (7.05.00 पासून पुढे)

संबंधित बातम्या :

NIA झाली आता ‘ईडी’ची एन्ट्री; परमबीर सिंहांच्या 100 कोटींच्या लेटरबॉम्बची चौकशी करणार?

Parambir Letter Bomb: IPS ज्युलियो रिबेरोंनी शरद पवारांचा प्रस्ताव नाकारला; लेटरबॉम्बचा तपास करण्यास नकार

फडणवीस आणि परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेल्यावर महाराष्ट्रात लेटर बॉम्ब: शरद पवार

(Satyamev Jayate IPS Officer Sanjay Pandey had told Aamir Khan about broken system in Police Force)

Follow Us
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.