AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हाच तुझ्याशी शरीरसंबंध ठेवीन..; सोनम रघुवंशीने राजासमोर ठेवलेली ही अट

राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आता आणखी एक नवी माहिती समोर येत आहे. लग्नानंतर राजाचं जवळ येणं सोनमला अजिबात आवडत नव्हतं. म्हणून तिने त्याच्यासमोर एक अट ठेवली होती. ही अट कोणती होती, ते जाणून घ्या..

तेव्हाच तुझ्याशी शरीरसंबंध ठेवीन..; सोनम रघुवंशीने राजासमोर ठेवलेली ही अट
Sonam Raghuvanshi and Raja RaghuvanshiImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 11, 2025 | 2:09 PM
Share

लग्नाच्या अवघ्या 10 दिवसात पतीला भयानक मृत्यू दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सोनम रघुवंशीबद्दल सतत नवनवीन खुलासे होत आहेत. मेघालय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम हनिमूनच्या बहाण्याने पतीसोबत शिलाँगला गेली होती. इच्छेविरुद्ध लग्न झाल्याने ती या लग्नाबाबत खुश नव्हती. तिचं राज कुशवाह नावाच्या तरुणावर प्रेम होतं, परंतु घरच्यांनी बळजबरीने तिचं लग्न राजाशी लावून दिलं होतं. म्हणूनच तिने प्रियकर आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून राजाच्या हत्येचा कट रचला होता. लग्नानंतर सोनम राजाला तिच्या जवळ येण्यापासून सतत रोखत होती. इतकंच नव्हे तर तिने राजासमोर एक विशेष अटसुद्धा घातली होती.

लग्नानंतर सोनम राजासोबत तिच्या सासरच्या घरी फक्त चार दिवस राहिली होती. त्यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली. सोनमने तिच्या सासरी राहत असताना बॉयफ्रेंड राज कुशवाहला मेसेज करून सांगितलं होतं की तिला पती राजाचं जवळ येणं आवडत नव्हतं, असं वृत्त ‘इंडिया टुडे’नं सूत्रांच्या हवाल्याने दिलंय. राजा आणि सोनमचं लग्न 11 मे रोजी झालं होतं. त्यानंतर 20 मे रोजी ते हनिमूनसाठी गेले होते.

या हनिमून ट्रिपसाठी राजा सुरुवातीला तयार नव्हता. परंतु सोनमने हनिमूनला जाण्यासाठी राजाची मनधरणी केली आणि त्याला न सांगताच तिकिटंदेखील बुक केली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने राजाला सांगितलं की आधी गुवाहाटीतील कामाख्या देवीचं दर्शन घेईल. त्यानंतरच ती शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी देईल. खरंतर सोनमला राजाच्या हत्येचं प्लॅनिंग आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्सना तिथे पोहोचण्यासाठी वेळ घालवायचा होता. म्हणूनच ती विविध कारणं देऊन राजासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देत होते. अखेर तिने कामाख्या देवीच्या दर्शनाची अट राजासमोर ठेवली.

सोमवारी उत्तर प्रदेशातील गाझीपूर इथून सोनमला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर शिलाँग पोलिसांनी तिला ट्रान्झिट रिमांडमध्ये ठेवलंय. याप्रकरणी सोनमचा प्रियकर आणि इतर तीन आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. सोनम, तिचा प्रियकर आणि इतर तीन आरोपींची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर संपूर्ण सत्य बाहेर येऊ शकेल.

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?