AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात बैलगाडा शर्यतीला गालबोट, शेवटच्या दिवशी बैलगाडा घाटात तुफान राडा

पुण्यात पाच दिवसीय भव्य महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी कार्यक्रमात तुफान राडा झाल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले आहे.

पुण्यात बैलगाडा शर्यतीला गालबोट, शेवटच्या दिवशी बैलगाडा घाटात तुफान राडा
पुण्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान दगडफेकImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Apr 01, 2023 | 9:37 AM
Share

खेड-पुणे / सुनील थिगळे : खेड तालुक्यामधील चऱ्होली येथे पाच दिवस भव्य महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र शेवटच्या दिवशी या शर्यतीला गालबोट लागल्याची घटना घडली. शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या गाडा पळवल्यानंतर बैलगाडा घाटात तुफान दगडफेक करण्यात आली. बैलगाडा धावण्याच्या वेळी घड्याळ चुकीचं दाखवल्याच्या कारणावरून आयोजकांवर ही दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. यानंतर घाटात तुफान राडा झाला. दगडफेक करणाऱ्यांना नागरिकांनी चोप दिला. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ बैलगाडा घाटात दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

खेड तालुक्यातील चऱ्होली येथे खेड पंचायत समितीचे माजी सभापती रामदास ठाकूर पाटील यांच्या सहकार्याने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतीचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. या शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार होता. मात्र अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही. अनेक दिग्गज नेत्यांनी या स्पर्धेला भेटी देखील दिल्या होत्या. मात्र शेवटच्या दिवशी आणि शेवटच्या गाड्या वेळी हा अनुचित प्रकार घडल्याने एकच गोंधळ उडाला.

दगडफेक करणाऱ्यांना नागरिकांनी चोपले

राज्यात बैलगाडा शर्यत बंदी उठल्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून या महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी अंतिम फेरीमध्ये 31 गाडे पळविण्यात येणार होते. यामध्ये एक गाडा हा मावळ तालुक्यातील असून, त्यांनीच आयोजकांवर दगडफेक केल्याची माहिती कळतेय. दगडफेक झाल्यानंतर घाटामध्ये असलेल्या नागरिकांनी संबधित गाडा मालक आणि त्यांच्या समर्थकांना बेदम चोपले.

पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

या घटनेनंतर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले असून, पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करतात हे पाहणे औचित्याचे आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आळंदी पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झाली नव्हती. महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेप्रमाणे महाराष्ट्र केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. मात्र या घटनेने कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. आमदार सुनील शेळके यांनी देखील यावेळी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक