AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनैतिक संबंधांचा संशय, 50-60 जणांच्या टोळक्याने महिला आणि तरुणाला निर्वस्त्र करत गावात फिरवलं

झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील एका गावातून संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधांच्या संशयातून गावातील 50 ते 60 जणांच्या जमावाने एक महिला आणि तरुणाला प्रचंड मानसिक आणि शारीरिकरित्या छळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अनैतिक संबंधांचा संशय, 50-60 जणांच्या टोळक्याने महिला आणि तरुणाला निर्वस्त्र करत गावात फिरवलं
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 7:30 PM
Share

रांची : झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील एका गावातून संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधांच्या संशयातून गावातील 50 ते 60 जणांच्या जमावाने एक महिला आणि तरुणाला प्रचंड मानसिक आणि शारीरिकरित्या छळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे गावातील तरुणांनी आधी पीडितांना खोलीत डांबून ठेवलं. त्यानंतर महिला आणि तरुणाला निर्वस्त्र करत गावात आणि गावाबाहेर एक किमीपर्यंत फिरवत नेलं. काही नराधमांनी हा सर्व प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद करत त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तसेच 50-60 अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

महिलेचा मजुरी करुन उदरनिर्वाह

संबंधित घटना ही दुमका जिल्ह्यातील मुफस्सिल पोलीस ठाणे हद्दीत घडली. पीडित महिला आपल्या तीन लहान मुलांसह गावात राहते. संबंधित गाव हे तिचं सासर आहे. महिलेचा पती हा गेल्या वर्षभरापासून दुमका जेलमध्ये कारावासाची शिक्षा भोगतोय. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी ही महिलेवर आहे. महिला मजुरी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.

नेमकं काय घडलं?

मजुरीचं काम करत असताना महिलेची एका तरुणासोबत ओळख झाली. संबंधित तरुणाचं देखील लग्न झालेलं असून त्याला दोन लाहन मुलं आहेत. हा तरुण सोमवारी संध्याकाळी (27 सप्टेंबर) पीडित महिलेच्या घरी तिला भेटण्यासाठी आला. यावेळी गावातील चार-पाच तरुणांनी त्यांना पकडलं. त्यांनी पीडितांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यावेळी गावातील आणखी 50 ते 60 जणांचा जमाव गोळा झाला. जमलेल्यांनी महिला आणि तरुणाला छळायला सुरुवात केली. त्यांनी महिला आणि तरुणाच्या अंगावरील कपडे फाडत त्यांना निर्वस्त्र केलं. त्यानंतर त्यांना गावातून फिरवत गावाबाहेर चालत नेलं.

अखेर पोलीस घटनास्थळी दाखल

या दरम्यान शेजारील गावच्या नागरिकांनी जेव्हा कृत्य बघितलं तेव्हा त्यांनी या कृत्यावर विरोध दर्शवला. तसेच दुमका मुफस्सिल पोलीस ठाण्यात एकाचा फोन गेला. त्याने संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस त्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पीडितांना जमावातून सुरक्षित बाहेर काढलं. त्यानंतर सोमवारी रात्री पीडितांनी पोलीस ठाण्यात आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली. पोलिसांनी त्यांना आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं.

पोलिसांकडून तपास सुरु

या घटनेप्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरु आहे. पीडितांनी न्यायाची मागणी केलीय. याशिवाय या घटेनची स्थानिक मीडियापासून राष्ट्रीय स्तरावरच्या माध्यमांनी दखल घेतली आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव वाढला आहे. पीडितांवर खूप मोठा अत्याचार झाला आहे. त्यांना योग्य न्याय मिळणं जरुरी आहे. तसेच आरोपींना मोकाट सोडता कामा नये. त्यांना योग्य शिक्षा व्हायलाच हवी, जेणेकरुन पुन्हा तशा घटनेती पुनरावृत्ती होणार नाही. पोलिसांनी आतापर्यंत या घटनेप्रकरणी चौघांना अटक केली आहे. तसेच 50-60 अज्ञातांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. ते सर्व आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच या घटनेमुळे संपूर्ण झारखंड राज्य हादरलं आहे.

हेही वाचा :

सासरच्यांना भेटून आला, रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांसोबत गप्पा, सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत, घरातल्या पाच जणांचा रहस्यमय मृत्यू

तब्बल 21 महिलांवर बलात्कार अन् हत्या, अंतर्वस्त्रांची चोरी करणाऱ्या उमेश रेड्डीची थरकाप उडवणारी कथा, शिक्षाही तशीच !

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...