UP Crime : उत्तर प्रदेशात 24 तासांत दोन मुलींच्या हत्या, एकतर्फी प्रेमातून घडल्या घटना

21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आला. बुधवारी एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाली. तसेच दुसऱ्या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरा शौचासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात आढळून आला.

UP Crime : उत्तर प्रदेशात 24 तासांत दोन मुलींच्या हत्या, एकतर्फी प्रेमातून घडल्या घटना
व्हॉट्सअपवर स्वतःच्या श्रद्धांजलीची पोस्ट टाकली, मग विष प्राशन करुन आत्महत्या
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 9:05 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न जैसे थे आहे. एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधाम सुरु झाली आहे. त्यादरम्यान महिला सशक्तीकरणाचे दावे केले जात आहेत. प्रत्यक्षात महिला आणि मुलींच्या सुरक्षेला धक्का देणाऱ्या घटना घडतच आहेत. हरदोई जिल्ह्यात मागील 24 तासांत दोन मुलींच्या हत्या झाल्याने या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. यापैकी एक घटना एकतर्फी प्रेम प्रकरणातून घडल्याचे उघडकीस आले आहे.

नेमक्या घटना काय आणि कुठे घडल्या?

21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात कोयत्याने वार करून तिचा खून करण्यात आला. बुधवारी एकतर्फी प्रेमातून तिची हत्या झाली. तसेच दुसऱ्या प्रकरणात बुधवारी रात्री उशिरा शौचासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात आढळून आला. तिची गळा आवळून हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले आहे. या दोन हत्यांमुळे जिल्ह्यात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या दोन्ही प्रकरणांचा सखोल तपास करीत आहेत.

24 तासांत दोन हत्या झाल्याने खळबळ

बुधवारी रात्री 7.30 च्या सुमारास हरपालपूरच्या काकरा गावात 21 वर्षीय तरुणी शेतात शौच करण्यासाठी गेली होती. तिथे तिला तिच्या प्रियकराने गाठले आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून लोक धावले. मात्र आरोपी प्रियकराने तेथून पळून गेला. मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी पूर्ववैमनस्यातून मुलीची हत्या झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला लवकरच पकडले जाईल, असा दावा पोलिसांनी केला आहे.

शेतात आढळले मुलींचे मृतदेह

दुसऱ्या प्रकरणात बुधवारी सायंकाळी घरातून शौचासाठी बाहेर पडलेल्या 19 वर्षीय तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली. रात्री उशिरा अकराच्या सुमारास मोहरीच्या शेतात तिचा मृतदेह आढळून आला. शौचास गेलेली तरुणी बराच वेळ होऊनही घरी न परतल्याने तिचा शोध घेण्यात आला. त्यावेळी तिचा मृतदेह शेतात पडलेला आढळला. या मुलीची हत्या गळा आवळून केली गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.

आरोपींना लवकरच जेरबंद करू – पोलीस

लागोपाठ दोन मुलींच्या हत्या झाल्यामुळे जिल्हा पोलिसांची झोप उडाली आहे. हरदोईचे पोलीस अधीक्षक अजय कुमार यांनी, दोन्ही हत्यांमागील नेमक्या कारणांचा शोध घेतला जात असून आम्ही लवकरच योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू, आरोपींना लवकरच तुरुंगात टाकले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (Two girls killed in 24 hours in Uttar Pradesh)

इतर बातम्या

धक्कादायक ! पतीनेच दोन साथीदारांसोबत मिळून पत्नीवर केला गँगरेप; कोर्टाने ठोठावली ही शिक्षा

Sangli Crime: सांगलीत दोन तरुणी आणि एका तरुणाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?

Non Stop LIVE Update
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबईत भाजपनं उमेदवार बदलला, पूनम महाजनांचा पत्ता कट.
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान
गडी आपल्यात आला पाहिजे, नाहीतर घाबरून...,सदाभाऊंचं ईडीसंदर्भातील विधान.
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.