AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकतर्फी प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या, भर बाजारपेठेत तरुणाचा हल्ला

आरोपीचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, मात्र मुलीचा यासाठी स्पष्ट नकार होता. आरोपीने अनेक वेळा मुलीजवळ आपले प्रेम व्यक्त केले, मात्र ती तयार झाली नाही

एकतर्फी प्रेम प्रकरणातून 22 वर्षीय तरुणीची हत्या, भर बाजारपेठेत तरुणाचा हल्ला
मिठाईच्या दुकानातील उकळत्या पाण्यात पडली चिमुकली
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jan 02, 2022 | 2:06 PM
Share

लखनौ : उत्तर प्रदेशातील देवबंदमध्ये 22 वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आली. भर बाजारात तरुणीवर चाकूने वार करण्यात आले होते. एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा आरोप आहे. पोलिसांनी काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील नागल शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. भर बाजारपेठेत चाकूने भोसकल्यामुळे तरुणी जखमी झाली होती. स्थानिक नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या नातेवाईकांनी त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणावर खुनाचा आरोप केला. पोलिसांनी तातडीने एक पथक तयार करून आरोपीला अटक केली.

एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला

आरोपीचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती, मात्र मुलीचा यासाठी स्पष्ट नकार होता. आरोपीने अनेक वेळा मुलीजवळ आपले प्रेम व्यक्त केले, मात्र ती तयार झाली नाही. याचा राग आल्याने त्याने आपल्या मुलीची हत्या केल्याचा आरोप तरुणीच्या आईने केला आहे.

तरुणीचे लग्न ठरल्याने आरोपीचा संताप

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आरोपी तरुणालाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी एसपी (शहर) राजेश कुमार यांनी सांगितले की, आरोपीचे तरुणीवर एकतर्फी प्रेम होते आणि दोघेही एकमेकांचे नातेवाईक आहेत, तरुणीचे लग्न इतरत्र ठरल्याने तरुण संतापला आणि त्याने तिच्यावर चाकूने वार केले.

संबंधित बातम्या :

पिकअप व्हॅन झाडावर आदळून भीषण अपघात, चौघींचा मृत्यू, पाच जणी गंभीर

मेट्रो कारशेडमध्ये लोखंडी गज उतरवताना अपघात, पिंपरीत 27 वर्षीय कामगाराचा मृत्यू

CCTV | घराबाहेर उभ्या तरुणांच्या अंगावर बुलेट घातली, उल्हासनगरात पोलिसांची दादागिरी

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत