AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अज्ञातांकडून पुन्हा वाहनांची तोडफोड, मध्यरात्री घडलेल्या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण

कल्याणमध्ये गुन्हेगारी सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. पुन्हा वाहनतोडीचे सत्र सुरु झाल्याने, गुन्हेगारांना पोलिसांचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येते.

अज्ञातांकडून पुन्हा वाहनांची तोडफोड, मध्यरात्री घडलेल्या घटनेने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण
कल्याणमध्ये पुन्हा वाहनांची तोडफोडImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 25, 2023 | 6:42 AM
Share

कल्याण : कल्याणमध्ये पुन्हा वाहन तोडफोडीचे सत्र सुरु झाले आहे. काल मध्यरात्री कल्याण पूर्वेतील नेतीवली परिसरात एका अज्ञातांकडून रस्त्यावर उभ्या असलेल्या 3 ते 4 रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. तोडफोडीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणामुळे वाहन चालकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. संबंधित आरोपीला लवकरात लवकर पोलिसांनी पकडून कठोर कारवाई करावी, त्याचप्रमाणे पोलिसांनी रात्रीच्या वेळेला ग्रस्त वाढवावी, अशी मागणी रिक्षा चालकांकडून केली जात आहे.

रिक्षा फोडताना आरोपी सीसीटीव्हीत कैद

या सीसीटीव्ही दिसणारा व्यक्ती आधी आपल्या हाताने रिक्षाची काच फोडण्याचा प्रयत्न करतो. मात्र हाताला मार लागल्यानंतर तो संतापतो. मग रस्त्यावरील दगड हातात घेऊन आपल्या वाटेत येणाऱ्या सर्व रिक्षांच्या काचा फोडत तो निघतो. मात्र या घटनेमुळे रिक्षा चालकांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोकीसानी गुन्हा नोंद करत पुढील तपास सुरू केला आहे.

पुण्यातही तोडफोड सत्र सुरु

पुण्यातही टोळक्यांकडून पुन्हा गाड्यांची तोडफोड सत्र सुरु करण्यात आले होते. येरवड्यात गाड्यांच्या तोडफोड करण्यात आली होती. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. हातात कोयते घेऊन दहशत माजवून 6 ते 7 गाड्यांची तोडफोड केली. पूर्व वैमनस्यातून गाड्यांची तोडफोड केल्याचे तपासात समोर आलं होतं.

तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी सुभाष राठोड, अनिल उर्फ पोपट वाल्हेकर या दोघांची चव्हाण गँगने हत्या केली होती. त्यातील तीन आरोपीची नुकतीच जामीनावर सुटका झाली होती. त्या रागातून हत्या झालेल्या राठोड गटातील तरुणांनी दहशत माजवण्यासाठी गाड्या फोडल्या होत्या. यामध्ये चार चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी या गाड्यांचा समावेश होता.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.