AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं, मुलांनी मारल्या उड्या त्यानंतर समोर आलं भयानक सत्य!

पाण्यात असं काहीतरी तरंगत होतं की जे पाहून सर्वांनाच बसला धक्का, पण जर त्या मुलांनी उडी नसती घेतली तर कधीच सत्य उलगडलं नसतं.

पाण्यात काहीतरी तरंगताना दिसलं, मुलांनी मारल्या उड्या त्यानंतर समोर आलं भयानक सत्य!
| Updated on: Apr 02, 2023 | 10:45 PM
Share

Crieme News : प्रेम करणं सोपं असतं, पण आपण प्रेम करत असलेल्या व्यक्तीसोबत लग्न करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोच. आपलं प्रेम आपल्याला सहजासहजी कधीच मिळत नसतं. आजकाल तर लव्ह मॅरेज करताना घरच्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. मग काही कपल्स घरच्यांच्या विरोध असला तरी पळून जाऊन लग्न करतात. पण काही कपल्स असे असतात जे घरच्यांनी विरोध केल्यानंतर टोकाचं पाऊल उचलतात. तर आता अशीच एक घटना समोर आली आहे.

घरातील सदस्य लग्नासाठी तयार न झाल्यामुळे एका प्रेमी युगुलाने गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र यामध्ये प्रेयसीचा जीव वाचला असून प्रियकर बेपत्ता आहे. ही धक्कादायक घटना उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील जगद्दल भागात घडली आहे.

जगद्दल येथील सत्तावीस वर्षीय मोहम्मद मुख्तार या तरूणाचं एका एकोणीस वर्षांच्या मुलीवर प्रेम होतं. परंतु या नात्याला मुलाच्या घरच्यांचा विरोध होता. मिळालेल्या माहितीनुसार या प्रेमी युगुलाने शनिवारी (1 एप्रिल) हुगळी नदीवरील ज्युबली पुलावरून गंगेत उडी मारली. त्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी मुलीचा जीव वाचवला मात्र, तरुण अद्यापही बेपत्ता आहे.

चुंचुडा तामलीपाडा घाटातील काही स्थानिक रहिवाशांनी मुलीला गंगेत तरंगताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिला नदीतून बाहेर काढून चुंचुडा रुग्णालयात दाखल केलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

बचाव कार्यादरम्यान उपस्थित असलेले शिबू माझी यांनी सांगितलं की, “काही मुलांनी मुलगी नदीत तरंगताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी तिला वाचवलं.”  ते पुढे म्हणाले की, “या मुलीनं दावा केला की तिनं आणि तिच्या प्रियकरानं एकत्र गंगेत उडी मारली होती, परंतु तरुण अद्यापही सापडलेला नाहीये.  पोलिसांच्या पथकानं त्याचा शोध सुरू केला आहे.

तरुणीचे नातेवाईक जियाउल मंडल यांनी सांगितलं की, तरुणाने आमच्या मुलीला फोन करून पळून जाण्यास सांगितलं. त्यानंतर चुंचुडा येथील एका व्यक्तीनं फोन करून आम्हाला पोलीस ठाण्यात संपर्क साधण्यास सांगितलं, असेही त्यांनी सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, ते दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्क होते. मात्र, मुलाच्या आईने लग्नाला होकार दिला नाही. त्याने रमजान महिन्यानंतर लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण प्रेमी युगुल त्याच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे ते घरातून पळून गेले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.