AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने नाशिकमध्ये महिलेचा मृत्यू

व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधल्या अशोकस्तंभ परिसरात घडली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने नाशिकमध्ये महिलेचा मृत्यू
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Oct 13, 2021 | 3:18 PM
Share

नाशिकः व्यायाम करताना इमारतीच्या टेरेसवरून पडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमधल्या अशोकस्तंभ परिसरात घडली आहे. प्रिया सतीश मटुमल, असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रिया सतीश मटुमल (वय 48 रा. विठ्ठल पार्क, अशोकस्तंभ) या रोज सकाळी इमारतीच्या टेरेसवर जाऊन व्यायाम करत असत. मंगळवारी सकाळीही त्यांनी आपला दिनक्रम नेहमीप्रमाणे व्यायमाने सुरू करण्यासाठी त्या इमारतीच्या टेरेसवर गेल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी व्यायमाला सुरुवात केली. मात्र, व्यायाम करताना त्यांचा अचानक तोल गेला. त्या इमारतीवरून थेट जमिनीवर कोसळल्या. या घटनेत प्रिया गंभीर जखमी झाल्या. त्यांना कुटुंबीयांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

उड्डाणपुलावर उडवले

नाशिकमध्ये द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावर घडली. यात घटनेत एका ट्रकने धडक दिल्यामुळे 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत झालेला तरुण अविनाश राजेंद्र सूर्यवंशी हा जळगाव जिल्ह्यातल्या गलवाडा येथील होता. सध्या तो सिडकोतल्या दत्त चौकात रहायचा. याबाबत माहिती अशी की, अविनाश हा द्वारका सर्कलकडून दुचाकीवर (एम. एच. 15 डीजी 2239) उड्डाणपुलावरून सिडकोकडे जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने (एम.पी. 09 एच.एच.8267) त्याच्या दुचाकीला उडवले. या घटनेत अविनाश जबर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेतून तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकीवरून पडल्याने मृत्यू

नाशिकमध्ये दुचाकीवरून पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. महेश कारभारी शिंदे (वय 30) असे मृताचे नाव आहे. ही घटना औद्योगिक वसाहतीत झाली. याबाबतची माहिती अशी की, महेश शिंदे हे एमआडीसीतून श्रमिकनगरकडे चालला होता. मात्र, अचानक धावत्या दुचाकीवरून ते रस्त्यावर पडले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने मुंबईनाका येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार मुसळे हे करत आहेत.

इतर बातम्याः

नाशिक पोलिसांची अनोखी भेट; नागरिकांना आनंदाश्रू आवरेनात, चोरीस गेलेला साडेतीन कोटींचा ऐवज केला परत

धक्कादायकः वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे रेल्वे कर्मचाऱ्याची सचखंड एक्स्प्रेसखाली आत्महत्या; 16 जणांवर गुन्हा दाखल

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.