AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकरावी ऑनलाईन प्रवेश सराव अर्ज भरण्यासाठी नवीन मुदत, 17 मेच्या तारखेत बदल

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येतात

अकरावी ऑनलाईन प्रवेश सराव अर्ज भरण्यासाठी नवीन मुदत, 17 मेच्या तारखेत बदल
प्रातिनिधीक फोटो Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 9:03 AM
Share

पुणे : अकरावी ऑनलाईन प्रवेशाला (Online Admission) पहिल्याच टप्प्यात दिरंगाई झाल्याचं पाहायला मिळत आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशाचा सराव अर्ज 17 मेपासून भरण्यासाठीचे वेळापत्रक (11th Timetable) जाहीर करण्यात आले होते. मात्र आता तारखेत बदल करण्यात आला आहे. 23 मेपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करता येईल. सुधारित वेळापत्रक लवकर जाहीर करण्यात येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात अर्जाचा पहिला भाग, तर 20 जूननंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल

मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येतात. प्रवेश प्रक्रियेचे नियोजन करुन संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. मात्र दहावीचा निकाल 20 जूनला जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशासंदर्भात शाळा आणि मार्गदर्शन केंद्राचे उद्बोधन वर्ग घेण्यात आलेले आहेत. यापुढे आता यूट्यूब आणि फेसबुक लाईव्हद्वारे पालकांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन देण्यात येणार आहे. यंदा प्रवेशाच्या नियमित तीन, तर एक विशेष फेरी राबवण्यात येईल. तर एफसीएफएस फेरीऐवजी प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे.

अकरावी प्रवेशाचा अर्ज भरण्याचा सराव करता यावा, म्हणून विद्यार्थ्यांना 23 मे पासून संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज कसा भरायचा, याबाबत सराव करता येणार आहे. प्रवेशासाठीचे कॉल सेंटरदेखील त्याच दिवशी सुरु करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी-पालकांना कोणत्याही शंका किंवा अडचणी आल्यास कॉल सेंटरचा पर्याय उपलब्ध असेल.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.