AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्यापासून बारावीची परीक्षा, परीक्षा केंद्रावर जमावबंदीचे कलम 144 लागू

बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. कोरोनानंतर प्रथमच ही परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन होत आहे. यंदा संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख विद्यार्थी बसले आहेत.

उद्यापासून बारावीची परीक्षा, परीक्षा केंद्रावर जमावबंदीचे कलम 144 लागू
schoolImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 20, 2023 | 6:49 PM
Share

मुंबई : बारावी बोर्डाच्या परीक्षेला राज्यभरात उद्या मंगळवार पासून सुरूवात होत आहे. कोविडच्या साथीनंतर दोन वर्षांनी पुन्हा पूर्ववत परीक्षा नेहमीप्रमाणे ऑफलाईन होणार आहे. या वेळी प्रथमच कॉपी टाळण्यासाठी परीक्षेचा पेपर निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपूर्वी देण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना शेवटची दहा मिनिटे वाढवून देण्यात येणार आहेत. यंदा 14 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी चोख तयारी केली आहे.

महाराष्ट्र स्टेट बोर्डाची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे. कोरोनानंतर प्रथमच ही परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईन होत आहे. यंदा संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाकाळात दहावीच्या विद्यार्थ्यांना मेरिटवर पास करण्यात आले होते. त्यामुळे पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. त्यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्येत मोठी वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे.

जमावबंदीचे कलम 144 लागू

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा कॉपी रोखण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. कॉपी रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावर जमावबंदीचे कलम 144 लागू केले आहे. तर केंद्रांवर कॉपी रोखण्याकरीता विशेष भरारी आणि बैठी पथके गस्त घालणार आहेत. पेपरफूट टाळाण्यासाठी परीक्षा केंद्रावर दहा मिनिटाआधी प्रश्न पत्रिका पुरविण्याच्या नियमाबदल केला आहे. केंद्रावर पन्नास मीटर परिसरात विद्यार्थ्यांशिवाय कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही, तसेच पेपर लिहीताना शेवटी दहा मिनिटे वाढविण्यात येतील.

सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय

पन्नास मीटर अंतरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या परीक्षेची जय्यद तयारी करण्यात आली आहे. उच्च शिक्षण विभाग शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा संप सुरू आहे. मात्र असे असेल तरी बारावीचे प्रॅक्टिकल पार पडले आहे. जर कोणत्या महाविद्यालयात प्रॅक्टिकल राहिले असेल तर थिअरीनंतर प्रॅक्टिकल देण्याची सोय करण्यात आली आहे. कोरोनाकाळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या होत्या. आता पुन्हा पूर्वी प्रमाणे ऑफलाईन परीक्षा घेण्यात येत आहे.

Follow Us
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल