AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीचे गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात या तारखेपासून मिळणार

बारावीच्या गुणपत्रिका १६ मेपासून विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात मिळण्यास सुरुवात होणार आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. राज्याच्या निकालाची टक्केवारी ९१.८८ टक्के राहिली.

बारावीचे गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात या तारखेपासून मिळणार
HSC Result
| Updated on: May 13, 2025 | 12:37 PM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मंडळाने या परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी तर दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला. हा निकाल ऑनलाईन होता. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये गुणपत्रक मिळणार आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातील विद्यार्थ्यांना १६ मे पासून गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात मिळणार आहे.

बारावीच्या गुणपत्रिका १६ मेपासून विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात मिळण्यास सुरुवात होणार आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. राज्याच्या निकालाची टक्केवारी ९१.८८ टक्के राहिली. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६.७४ टक्के लागला होता. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के राहिला.

बारावीच्या परीक्षेत सर्व विभागीय मंडळातून यंदाही मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त राहिली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक आहे. यंदाही मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली होती.

सन 2024-25 मध्ये बारावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या इतिहासात प्रथमच बारावीचा निकल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागला. परंतु यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के होता. तर फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के राहिला आहे. यंदा निकालाची टक्केवारी 1.49 टक्क्यांनी कमी आहे.

दहावीचा निकाल जाहीर

दरम्यान, 13 मे रोजी बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला. या निकालातही मुलांपेक्षा मुलींच आघाडीवर राहिल्या. ९६.१४ टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ टक्क्यांनी अधिक आहे. दहावीच्या निकालात लातूर बोर्डातील ११३ विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले. त्यामुळे लातूर पॅटर्नची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.