AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीचे गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात या तारखेपासून मिळणार

बारावीच्या गुणपत्रिका १६ मेपासून विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात मिळण्यास सुरुवात होणार आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. राज्याच्या निकालाची टक्केवारी ९१.८८ टक्के राहिली.

बारावीचे गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात या तारखेपासून मिळणार
HSC Result
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 13, 2025 | 12:37 PM
Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. मंडळाने या परीक्षांचा निकाल जाहीर केला आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी तर दहावीचा निकाल १३ मे रोजी जाहीर केला. हा निकाल ऑनलाईन होता. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये गुणपत्रक मिळणार आहे. पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोल्हापूर, अमरावती, लातूर, नागपूर आणि रत्नागिरी या विभागातील विद्यार्थ्यांना १६ मे पासून गुणपत्रक शाळा-महाविद्यालयात मिळणार आहे.

बारावीच्या गुणपत्रिका १६ मेपासून विद्यार्थ्यांच्या शाळा आणि महाविद्यालयात मिळण्यास सुरुवात होणार आहे. बारावीचा निकाल ५ मे रोजी जाहीर झाला. राज्याच्या निकालाची टक्केवारी ९१.८८ टक्के राहिली. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा ९६.७४ टक्के लागला होता. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा ८९.४६ टक्के राहिला.

बारावीच्या परीक्षेत सर्व विभागीय मंडळातून यंदाही मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी जास्त राहिली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58 टक्के असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51 टक्के आहे. मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा 5.07 टक्क्यांनी अधिक आहे. यंदाही मुलींनी बारावीच्या निकालात बाजी मारली होती.

सन 2024-25 मध्ये बारावीची परीक्षा लवकर घेण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या इतिहासात प्रथमच बारावीचा निकल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागला. परंतु यंदा निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37 टक्के होता. तर फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के राहिला आहे. यंदा निकालाची टक्केवारी 1.49 टक्क्यांनी कमी आहे.

दहावीचा निकाल जाहीर

दरम्यान, 13 मे रोजी बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केला. या निकालातही मुलांपेक्षा मुलींच आघाडीवर राहिल्या. ९६.१४ टक्क्यांसह मुलींनी बाजी मारली आहे. मुलांची टक्केवारी ९२.३१ टक्के आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ३.८३ टक्क्यांनी अधिक आहे. दहावीच्या निकालात लातूर बोर्डातील ११३ विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर गुण मिळाले. त्यामुळे लातूर पॅटर्नची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा