AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11th Admission : अकरावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

11th Admission इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचा भाग एक भरूनही, तब्बल 11 हजार 930 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भागच भरला नाही. दुसरा भाग हा महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाशी संबंधित आहे.

11th Admission : अकरावीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
NEET PG allotmentImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 29, 2022 | 7:36 AM
Share

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षांचे (Exam) निकाल (result) लागले असून, आता विद्यार्थी (students)आणि पालकांची प्रवेश घेण्यासाठी घाई सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आपल्याला आपल्या आवडत्या शाखेत तसेच महाविद्यालयातच प्रवेश मिळावा असे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र यंदाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर येत आहे, ती म्हणजे इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या अर्जाचा भाग एक भरूनही, तब्बल 11 हजार 930 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भागच भरला नाही. दुसरा भाग हा महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाशी संबंधित आहे.  प्रवेश अर्जात पसंतीक्रम न नोंदविल्यामुळे प्रवेशाच्या संधीपासून हे विद्यार्थी वंचित राहून नयेत,  म्हणून आता पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने येत्या शनिवारपर्यंत म्हणजेच 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

ऑनलाईन प्रक्रिया

सध्या राज्यातील इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ही केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. त्यासाठी नियमित प्रवेश फेरी क्रमांक एकसाठीचे वेळापत्रक संचालनालयाकडून यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. या प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना भाग एक आणि भाग दोन अशा दोन टप्प्यांत अर्ज भरायचा आहे. मात्र राज्यातील तब्बल 11 हजार 930 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्जाचा दुसरा भागच भरला नाही. दुसरा भाग हा महाविद्यालयांच्या पसंतीक्रमाशी संबंधित आहे.  त्यामुळे महाविद्यालय न निवडल्याने हे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी आता  पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने येत्या शनिवारपर्यंत म्हणजेच 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्जाचा दुसरा भाग भरला नाही, त्यांना आता उद्यापर्यंत अर्ज भरण्याची संधी आहे.

विद्यार्थ्यांना दिलासा

दरम्यान  पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी अर्ज करण्यास माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने येत्या शनिवारपर्यंत म्हणजेच 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विविध कारणांमुळे जे विद्यार्थी अर्जाचा भाग दोन भरू शकले नाहीत, त्यांना आता आणखी दोन दिवस अर्ज करता येणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.