AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार, विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स करावा लागणार, ब्रीज कोर्स कसा असणार?

कोरोना विषाणू संसर्ग झाल्यापासून महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. (Maharashtra School Bridge Course)

शाळांची उन्हाळी सुट्टी संपणार, विद्यार्थ्यांना ब्रीज कोर्स करावा लागणार, ब्रीज कोर्स कसा असणार?
शाळा
| Edited By: | Updated on: Jun 11, 2021 | 4:39 PM
Share

मुंबई: कोरोना विषाणू संसर्ग झाल्यापासून महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. मार्च 2020 पासून महाराष्ट्रातील शाळा बंद आहेत. सलग दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. तर, 15 महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या शालेय अभ्यासक्रमातील प्रगती आणि उजळणीसाठी ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद ब्रीज कोर्स म्हणजेच उजळणी अभ्यासक्रम घेणार आहे. हा ब्रीज कोर्स दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल. (Maharashtra State Education research and Training council make compulsory completion of bridge course for class 2 to 8)

ब्रीज कोर्सची गरज काय?

महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर कोरोनाचं सावट आहे. गेल्या वर्षीपासून विद्यार्थी शाळेमध्ये आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाद्वारे शिक्षण देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वर्षभराच्या ऑनलाईन शिक्षणाच्या काळात किती कौशल्य विकसित केले आहेत. याची चाचणी ब्रीज कोर्समधून घेतली जाणार आहे.

ब्रीज कोर्समध्ये काय असणार?

एखादा विद्यार्थ्यी चौथीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार असेल तर त्याला शाळा सुरु झाल्यानंतर पहिले 45 दिवस तिसरीचा अभ्यासक्रम शिकवला जाईल. यामध्ये सर्व विषयांच्या अभ्यासक्रमाची उजळणी करुन घेतली जाईल. 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयावरील पेपर द्यावा लागेल . हा पेपर गेल्या वर्षीच्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. यातून विद्यार्थ्यानं किती कौशल्य प्राप्त केली आहेत, याची चाचणी घेतली जाईल. ब्रीज कोर्स शाळा सुरु झाल्यानंतर राबवण्यात येणार आहे.

गणित विज्ञान विषयाला अधिक महत्व

ब्रीज कोर्समध्ये सर्व विषयांचे पेपर आयोजित केले जाणार असले तरी प्रामुख्यानं गणित आणि विज्ञान विषयावर अधिक भर असणार आहे. तर, सुरुवातीच्या 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची ब्रीज कोर्सच्या माध्यमातून तयारी करुन घेतली जाणार आहे.

सर्व शाळांना बंधनकारक

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने ब्रीज कोर्स महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांना अनिवार्य केला आहे. महाराष्ट्रातील सीबीएसई आणि इतर बोर्डांच्या शाळांना हा निर्णय लागू नसेल. दुसरी ते आठवीच्या वर्गासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रीज कोर्समधून विद्यार्थ्यांची पुढील वर्गातील अभ्यासक्रम शिकण्याची क्षमता देखील जाणून घेतली जाणार आहे.

संबंधित बातम्या:

SET Exam: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

SSC Result: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होणार

(Maharashtra State Education research and Training council make compulsory completion of bridge course for class 2 to 8

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.