AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावीच्या परीक्षा रद्द करा, अरविंद केजरीवाल यांची नरेंद्र मोदींकडे मागणी, निकालाचा फॉर्म्युलाही सांगितला

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण केल्याशिवाय परीक्षा घेऊ नये, अशी भूमिका मांडली. Arvind Kejriwal class 12th exam

बारावीच्या परीक्षा रद्द करा, अरविंद केजरीवाल यांची नरेंद्र मोदींकडे मागणी, निकालाचा फॉर्म्युलाही सांगितला
अरविंद केजरीवाल आणि नरेंद्र मोदी
| Updated on: Jun 01, 2021 | 6:20 PM
Share

नवी दिल्ली: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. बारावीच्या परीक्षेमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या चिंतेत आहेत. पालकांची आणि विद्यार्थ्यांची सध्याच्या परिस्थितीमध्ये लसीकरणा शिवाय बारावीची परीक्षा होऊ नये, अशी अपेक्षा असं मत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. (New Delhi CM Arvind Kejriwal tweet and demanding cancel class 12th exam before PM Narendra Modi meeting)

अरविंद केजरीवाल यांचे ट्विट

केजरीवाल यांनी ट्विट करत केंद्र सरकारकडे परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीच्या गुणांच्या आधारे यंदादेखील पास पास केलं जावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी केजरीवाल यांनी ही मागणी केली आहे. 23 मे रोजी झालेल्या बैठकीत नवी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याशिवाय परीक्षा घेऊ नयेत, अशी भूमिका मांडली होती.

सीबीएसईकडून दहावीची परीक्षा रद्द

देशातील वाढत्या संख्येचा पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय 14 एप्रिल 2019 रोजी घेतला होता. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकून 1 जून रोजी आढावा घेऊन निर्णय जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आलं होतं. यासंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली रमेश पोखरियाल निशंक यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सर्व राज्यांचे शिक्षण मंत्री शिक्षण सचिव यांनी त्यांची मते मांडली होती.

सुप्रीम कोर्टात परीक्षा रद्द करण्यासाठी याचिका

देशातील कोरोना रुग्णसंख्या पार्श्वभूमीवर अ‌ॅड. ममता शर्मा यांनी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या याचिकेवर हस्तक्षेप याचिका देखील दाखल झालेल्या आहेत. सुप्रीम कोर्ट या संदर्भात गुरुवारी म्हणजे 3 जून रोजी अंतिम निर्णय देण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने निर्णय जाहीर करण्यासाठी 2 दिवसांचा वेळ मागून घेतला होता.

संबंधित बातम्या:

HSC exam: केंद्रीय शिक्षणमंत्री तब्येत बिघडल्याने रुग्णालयात, बारावीच्या परीक्षेचा निर्णय आता पंतप्रधान मोदी घेणार?

Maharashtra SSC exam hearing: दहावीच्या परीक्षा होणार की नाही? मुंबई हायकोर्टातील सुनावणी नेमकं काय घडलं?

(New Delhi CM Arvind Kejriwal tweet and demanding cancel class 12th exam before PM Narendra Modi meeting)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.