AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC AICTE : UGC AICTE पेटले ना राव ! म्हणे ‘पाकिस्तानात शिकलात’ तर ‘वाळीत’ टाकलं जाईल, विद्यार्थ्यांना तंबी !

भारतीय विद्यार्थ्यांनी पाकिस्तानातील कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊ नये. असं केल्यास ते आपल्या देशात कोणतीही नोकरी किंवा उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरणार नाहीत असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काल केलंय.

UGC AICTE : UGC AICTE पेटले ना राव ! म्हणे 'पाकिस्तानात शिकलात' तर 'वाळीत' टाकलं जाईल, विद्यार्थ्यांना तंबी !
म्हणे 'पाकिस्तानात शिकलात' तर 'वाळीत' टाकलं जाईल,Image Credit source: facebook
| Updated on: Apr 23, 2022 | 3:32 PM
Share

नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांनी (Indian Students) पाकिस्तानातील (Pakistan) कोणत्याही महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेऊ नये. असं केल्यास ते आपल्या देशात कोणतीही नोकरी किंवा उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरणार नाहीत असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) काल (शुक्रवारी) केलंय. चिनी संस्थांमध्ये सुद्धा भारतीयांनी शिक्षण घेऊ नये असा इशारा दिल्यानंतर महिनाभरातच युजीसी आणि एआयसीटीईने विद्यार्थ्यांना संयुक्तपणे हा सल्ला दिलेला आहे. पाकिस्तानातील कोणत्याही पदवी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा परदेशी नागरिकाला पाकिस्तानमध्ये मिळालेल्या या शैक्षणिक पात्रतेचा भारतात उपयोग होणार नाही. थोडक्यात, पाकिस्तानातील शैक्षणिक पात्रतेच्या आधारे भारतात नोकरी मिळवता येणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय.

भारतात रोजगार मिळणार नाही

” सर्वांना (विद्यार्थ्यांना) उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. भारतीय वंशाच्या (ओआयसी) कोणत्याही भारतीय नागरिकाला किंवा भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकाला पाकिस्तानातील एखाद्या महाविद्यालयात किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घ्यायचा असेल तर यापुढे पाकिस्तानी प्रमाणपत्राच्या आधारे भारतात नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी पात्र ठरणार नाही. त्यांना गृह मंत्रालयाकडून सुरक्षा मंजुरी मिळाल्यास ते भारतात रोजगार मिळण्यास पात्र ठरतील.

भारतातील विद्यार्थ्यांना इतर देशांमध्ये समस्या आहेत

एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांच्या मते, भारतीय विद्यार्थ्यांनी शिक्षणासाठी कोणत्या देशात जायला हवं आणि कोणत्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायला हवा याबाबतचा सल्ला देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर युजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले,’विद्यार्थी परदेशात परत जाऊन शिक्षण सुरु ठेऊ शकत नाहीत, अशा अनेक समस्यांचा त्यांना सामना करावा लागतो त्यामुळे देशाबाहेर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी युजीसी आणि एआयसीटीई अशा जाहीर सूचना जारी करतं.’

इतर बातम्या :

Nashik Accident : बुलडाणा, बीडनंतर आता नाशकात भीषण अपघात! वऱ्हाड्यांनी भरलेला टेम्पो उलटला, 13 जण जखमी

जगातील सर्वाधिक रोमँटिक लोक या देशात राहतात, वाचा सर्वेक्षण काय म्हणते!

Freedom fighter Kunwar Singh : कोण होते वीर कुंवर सिंह? ज्यांच्या विजयोत्सवावर अमित शाह जाणार अराहला

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.