AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPSC Final Result 2022 : यूपीएससीचा निकाल आला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कोणाला मिळाले यश

UPSC Final Result 2022 : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. पहिल्या चारमध्ये मुलीच आहेत. पहिला क्रमांक इशिता किशोरने पटकवला आहे. पुण्यातील मंगेश खिल्लारी याला यश मिळाले आहे.

UPSC Final Result 2022 : यूपीएससीचा निकाल आला, इशिता किशोर देशात प्रथम, महाराष्ट्रातून कोणाला मिळाले यश
ishita kishore
| Updated on: May 23, 2023 | 5:14 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल (Final Result UPSC) जाहीर करण्यात आला आहे. उमेदवारांना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. यंदा पहिल्या चारमध्ये मुलीच आहेत. पहिला क्रमांक इशिता किशोरने पटकवला आहे. दुसऱ्या स्थानावर गरिमा लोहिया तर तिसऱ्या स्थानावर उमा हरथीआहे. चौथा क्रमांक स्मृती मिश्राने पटकवला आहे.

UPSC ने यदा 1022 जणांची निवड केली आहे.. त्यात IAS साठी 180, इंडियन फॉरेन सर्विससाठी (IFS) 38 IPS साठी 200 जण आहेत. तसेच 473 कँडिडेट ग्रुप A आणि 131 कँडिडेच ग्रुप B साठी निवडले गेले आहे.

हे आहे पहिले दहा

  1. इशिता किशोर
  2. गरिमा लोहिया
  3. उमा हरथी एन
  4. स्मृती मिश्रा
  5. मयूर हजारिका
  6. गहना नव्या जेम्स
  7. वसीम अहमद भट
  8. अनिरुद्ध यादव
  9. कनिका गोयल
  10. राहुल श्रीवास्तव

इशिता नेहमी राहिली टॉपर

UPSC CSE 2022 च्या परीक्षेत ऑल इंडिया टॉपर असलेली इशिता किशोर नेहमीच टॉपर राहिली आहे. एअरफोर्स बालभारती स्कूल आणि दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये तिचे शिक्षण झाले. इशिताने लहानपणीच ठरवलं होतं की ती आयएएस अधिकारी व्हायची.

वडील एअरफोर्समध्ये

इशिता किशोरचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत आणि संपूर्ण कुटुंब ग्रेटर नोएडामध्ये राहते. इशिताने 2014 मध्ये बाल भारतीमधून तिचे 12 वी इयत्ता पूर्ण केले, त्यानंतर तिने 2017 मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्ससह पदवी पूर्ण केली. यूपीएससी परीक्षेतील त्याचा हा तिसरा प्रयत्न होता.

टॉपरची अपेक्षा नव्हती

इशिता आज निकालाची वाट पाहत होती, पण ती ऑल इंडिया टॉपर होईल याची तिला अपेक्षा नव्हती. निकाल लागताच तिचे नाव सर्वत्र पसरले. इशिताने सांगितले की, मी माझ्या वडिलांना नेहमीच देशसेवेसाठी तत्पर पाहिले आहे. म्हणूनच माझ्या वडिलांना पाहून मला लहानपणीच विचार आला होता की, मी मोठी झाल्यावर देशहितासाठी काम करेन, जेणेकरून मला माझ्या वडिलांप्रमाणे देशाची सेवा करता येईल.

महाराष्ट्रातून मंगेश खिल्लारीला यश

मंगेश खिल्लारी यूपीएससी परीक्षेत देशात 396 आला आहे. तो नगर जिल्ह्यातील सुकेवाडी येथील रहाणारा आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.