AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

आमच्या मतदारसंघात प्रचार करायला येऊ नका असे मेसेज मलाही आले. कुठून कुठून मेसेज आले हे सांगणं योग्य राहणार नाही. पण निरोप नक्की आले. कुठून आले, कुणाकडून आले आणि कोणत्या पक्षाकडून आले हे सांगणं योग्य नाही.

VIDEO: प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
VIDEO: प्रचार करू नका म्हणून मेसेज आले, पण कुठून आले हे सांगणार नाही; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
| Edited By: | Updated on: Feb 12, 2022 | 2:08 PM
Share

पणजी: आमच्या मतदारसंघात प्रचार करायला येऊ नका असे मेसेज मलाही आले. कुठून कुठून मेसेज आले हे सांगणं योग्य राहणार नाही. पण निरोप नक्की आले. कुठून आले, कुणाकडून आले आणि कोणत्या पक्षाकडून आले हे सांगणं योग्य नाही. राजकीय कोड असतं. ते पाळलं पाहिजे. म्हणून मी कोणत्याही पक्षाचे नाव घेणार नाही, असं महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) म्हणाले. त्यामुळे आदित्य यांना कोणत्या पक्षाने प्रचार न करण्याचे निरोप दिले यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. आमचा पक्ष गोव्यात कमजोर आहे. आमचं डिपॉझिट जाणार आहे तर आमच्यावर बोलता कशाला? भीती कशाची वाटते? होऊ दे प्रचार, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. तसेच येणाऱ्या काळात गोव्यातील (GOA) प्रत्येक गावात शाखा निर्माण करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गोवा विधानसभेनंतर लोकसभा (loksabha) निवडणुकीची तयारी करणार असल्याचंही आदित्य यांनी जाहीर केलं.

आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केलं. आम्ही गोव्यात 11 जागा लढवत आहोत. रिपोर्ट येत आहेत. ते फार बोलके आहेत. घरोघरी शिवसेना पोहोचली आहे. शिवसेनेचं चिन्हं धनुष्यबाण घरोघरी गेलं आहे. शिवसेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवसेना म्हणून गोव्यात ही निवडणूक लढत असताना प्रत्येक राज्यात प्रत्येक स्तरावर निवडणूक लढणार आहोत. प्रत्येक राज्यात आम्ही आता विधानसभा, लोकसभा, जिल्हापरिषद आणि ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार आहोत. महाराष्ट्राच्या बाहेरही शिवसेनेची गरज जाणवत आहे. महाराष्ट्राचं मॉडल आम्ही बाहेर नेणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

शाश्वत विकास झाला नाही

शिवसेना म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. शिवसेना गोव्याला नवीन नाहीये. शिवसेना स्थानिक भूमिपूत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. ही निवडणूक पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही. ही निवडणूक गोंयकरांबद्दलची आहे. गेली दहा वर्ष भाजपची राज्यात सत्ता आणि केंद्रात सात वर्ष सत्ता आहे. तरीही गोव्याचा शाश्वत विकास का झाला नाही? दुर्गम भागात पाणी प्रश्न असता तर समजू शकलो असतो पण मुख्य गोव्यात पाण्याचा प्रश्न आहे. मग कुणाचा विकास झाला? जनतेचा विकास झाला की काही पक्षाचा विकास झाला? हा प्रश्न राहतोच, असा सवालही त्यांनी केला.

छुप्या बैठका झाल्या नाही

आम्ही कोणत्या स्पेसिफिक वोटिंगसाठी आलो नाही. जात धर्माची मते घ्यायला आलो नाही. भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहोत. जी मैत्री जपली ती खुलेपणाने जपली. जे जपायचं आहे ते स्वच्छपणे केलं आहे. उत्पल पर्रिकरांना साफ आणि स्वच्छ मनाने पाठिंबा दिला आहे. त्यासाठी छुप्या बैठका झाल्या नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: शिवसेनेचे वाघ असतात, वाघांचा बाजार नसतो, भाजपने एनडीएच्या पाठीत खंजीर खुपसला; आदित्य ठाकरेंचा घणाघात

Goa Assembly Election 2022 : आदित्य ठाकरे गोव्याच्या दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सभा घेणार; वचननामाही प्रसिद्ध करणार

Pramod Sawant यांच्या साखळी मतदारसंघात Aaditya Thackeray घेणार जाहीर सभा

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.