AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेत आल्यास तीन महिन्यात आम्ही जातीनिहाय जनगणना करू; या पक्षाची मोठी घोषणा

उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

सत्तेत आल्यास तीन महिन्यात आम्ही जातीनिहाय जनगणना करू; या पक्षाची मोठी घोषणा
Akhilesh Yadav, Sanjay Singh (file photo)
| Edited By: | Updated on: Jan 16, 2022 | 4:57 PM
Share

उत्तर प्रदेश – पाच राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून देशात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यापैकी युपीच्या राजकारणावरती अनेकजण लक्ष ठेऊन आहेत. कारण मागच्या काही दिवसांपासून भाजपला (BJP) गंच्छची लागली आहे तर, भाजपकडून ओबीसी (OBC) कार्ड खेळले गेले आहे. त्यामुळे भाजप आणि समाजवादी पार्टीमध्ये (SAMAJWADI PARTY) अटीतटीची लढत होईल असं जाणकारांकडून म्हटलं जातंय.

हे सगळं सुरू असताना अखिलेख यादव यांनी युपीत मुळ मुद्याला हात घातल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सत्तेत आल्यास जातीनिहाय जनगणना करू अशी घोषणा केल्याने अखिलेश यादव यांनी सामान्य माणसाच्या नाडी ओळखली आहे असं म्हणता येईल. घेतलेला निर्णय समाजवादी पक्षाला किती फायद्याचा ठरतोय हे काही दिवसात स्पष्ट होईल.

सद्याचे भाजपचे मंत्री दारा सिंह चौहान यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात नुकताच प्रवेश केला आहे. त्याचं पध्दतीने अखिलेश यांच्याकडून त्यांचं स्वागतही करण्यात आलं आहे. ते योगी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री म्हणून काम करत होते. तसेच ‘अपना दलाचे आमदार डॉ. आरके वर्मा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. मुख्यालयात दोन्ही आमदारांचं स्वागत करण्यात आलं आहे.

सद्याचे भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर अखिलेश यादव यांच्याकडून वारंवार टीका केली जात आहे. योगी कोणत्या मतदार संघातून निवडणुक लढवतील असा प्रश्न अनेक दिवसांपासून पेंडिंग होता. परंतु त्यानी गोरखपूर हा मतदारसंघ निवडल्याने त्यांनी आता तिथेच राहावे असा खोचक टोला अखिलेश यादव यांनी मारला आहे.

403 जागांसाठी रणसंग्राम उत्तर प्रदेशात एकूण 403 जागा आहेत. राज्यात सात टप्प्यात मतदान होणार आहे. या टप्प्यानुसार 10 फेब्रुवारी, 14 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचे निकाल 10 मार्च रोजी जाहीर होणार आहेत.

UP Assembly Election: AIMIM च्या उमेदवारांची यादी जाहीर, या उमेदवारांना मिळाली संधी

Goa Assembly Election: बेरोजगारांना 3000/-, 18 वर्षावरील महिलांना 1000/-, केजरीवालांची घोषणा

युपीच्या राजकारणात बिकनीची चर्चा, करिअरचा राजकारणाशी संबंध जोडू नका

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.