AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एनडीएत आणखी घटक पक्ष जोडण्याचा भाजपचा प्रयत्न, काय आहे भाजपचा मास्टर प्लान?

भाजप कोणतीही रणनीती तयार करताना पूर्ण समीकरणं जुळवून पाहते. भाजपने आता जुन्या नाराज मित्र पक्षांना देखील एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. इतकंच नाही तर नव्या पक्षांना देखील भाजप आपल्या सोबत जोडत आहे. एनडीएला मजबूत करण्याचा भाजपता मास्टर प्लान आहे.

एनडीएत आणखी घटक पक्ष जोडण्याचा भाजपचा प्रयत्न, काय आहे भाजपचा मास्टर प्लान?
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 19, 2024 | 9:30 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा झालीये. केंद्रातील सत्ताधारी भाजप सध्या जुन्या मित्र पक्षांना तसेच इतर प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भाजप नेतृत्वाने 2024 च्या लढाईत एनडीएसाठी 400 पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे ते साध्य करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न होऊ लागले आहेत. हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपने अनेक पक्षांना सोबत घेतले आहे. दक्षिणेतही चांगली कामगिरी करता यावी यासाठी ही भाजपचा प्रयत्न सुरु आहे. नवीन पक्षांना एनडीएत आणून जागा वाढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

तामिळनाडूमध्ये भाजपने पीएमकेसोबत युती करण्याची घोषणा केली. दुसरीकडे महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेला देखील भाजपने सोबत घेण्यासाठी बोलणी सुरु केलीये. पंजाबमध्ये अकाली दल यांच्यासोबत बैठका आणि बोलणी सुरू आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण भाजपने रणनीती आखत ग्राऊंड लेव्हलपासून कामाला सुरुवात केली आहे. एनडीएला 400 जागा कशा मिळतील यासाठी समीकरणं जुळवली जात आहेत. एनडीएत नवीन मित्रपक्ष जोडले जात आहेत. जेडीयू, टीडीपी नंतर आता पीएमकेसोबत भाजपची युती झाली आहे. पीएमके (पट्टाली मक्कल काची) तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या दहा जागा लढवणार आहे.

भाजपसोबत युती करण्याचा निर्णय पीएमकेचे संस्थापक डॉ. एस. रामदास यांनी घेतला आहे. राज ठाकरेही एनडीएत सामील होणार आहे हे जवळपास नक्की झाले आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी एनडीएचा विस्तार होऊ शकतो. राज ठाकरे यांना किती जागा मिळतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे महायुतीतील चौथा भागीदार असेल. युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

पंजाबमध्ये भाजप आपला जुना मित्र अकाली दलला पुन्हा एनडीएमध्ये आणण्याचा विचार करत आहे. हे भाजपसाठी खूप महत्त्वाचे असेल. कारण दोघे एकत्र लढले तर अधिक जागा जिंकता येऊ शकतात. 22 मार्च रोजी अकाली दलची महत्त्वाची बैठक होणार आहे. भाजप आणि अकाली दल यांच्यात बैठक होणार असून, त्यात युती निश्चित होणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही युती झाली तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही लढाई कठीण होणार आहे.

Follow Us
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
कुत्रे भुंकतात… वाघ शिकार करतो! शिंदेंचा ठाकरेंवर थेट हल्लाबोल!
हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान
Eknath Shinde | हिम्मत असेल तर समोर या! शिंदेंचं ठाकरेंना थेट खुलं आव्हान, ऑपरेशन तुडवावर जोरदार पलटवार
माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार...
Uddhav Thackeray | माझ्यावरील आरोप खरे असतील तर पक्षप्रमुख पद सोडायला तयार; ठाकरेंचे मोठे विधान
ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
Uddhav Thackeray On Operation Kamal | ऑपरेशन टायगर नंतर; आधी ऑपरेशन कमळ करावं लागेल, ठाकरेंचा मोठा इशारा
आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले...
Uddhav Thackeray | आज त्या मतदारांची माफी मागतो! उद्धव ठाकरे भावुक, नेमकं काय म्हाणाले....
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
तुमची पोरं पळवणारी टोळी आहे! वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर हल्लाबोल
आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली
Uddhav Thackeray | आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नाही, सत्ता आमच्यासाठी जन्माला आली; ठाकरेंची सिंहगर्जना
हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा इशारा
Gulabrao Patil | हा फक्त झटका आहे, महापालिकेत मोठा चटका देणार; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन
2 दिवस थांबा... सगळं स्पष्ट होईल; श्रीकांत शिंदेंच्या एका वाक्याने वाढला सस्पेन्स
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा