AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मि. फडणवीस तुम्ही महाराष्ट्राची वाट लावलीत – संजय राऊत कडाडले, Video

देवेंद्र फडणवीस यांनी सुडाचं, कपटाचं राजकारण केलं. राजकीय सभ्यता, संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता, फडणवीस यांनी त्याचा नाश करण्याचं काम केलं. अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मि. फडणवीस तुम्ही महाराष्ट्राची वाट लावलीत - संजय राऊत कडाडले, Video
| Updated on: Jun 06, 2024 | 12:00 PM
Share

ज्या पद्धतीचं दळभद्री, सुडाचं, कपटाचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी केलं. राजकीय सभ्यता, संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता, फडणवीस यांनी त्याचा नाश करण्याचं काम केलं. पेशवेकालामध्ये आनंदी बाई होत्या, तसं ( फडणवीस) हे महाराष्ट्राच्या राजकारणातली ( पुरुष) आनंदी बाई आहेत, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला. मि. फडणवीस, जे दोन पक्ष तुम्ही फोडले, त्या दोन पक्षांनीच तुम्हाला जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली असेही राऊत म्हणाले. माध्यमांशी संवाद साधतान संजय राऊत यांनी फडणवीसांवर कडाडून हल्ला चढवला.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक

ही कटुता आमच्या मनात आहे, त्याला कारण ते स्वत: आहेत. महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण कधीच नव्हतं, ते फडणवीस यांनी सुरू केलं. त्याचा बदला जनतेने या लोकसभा निवडणुकीत घेतला. तुमचं हे सुडाचं, बदल्याचं फडतूस राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही हे लोकांनी फडणवीस यांना दाखवून दिलं. या महाराष्ट्रामधली एक पिढी खतम करण्याचं काम फडणवीस यांनी केलं. हातातली सत्ता, त्याचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी, राजकीय कार्यकर्त्यांवर सूड घेण्यासाठी वापरला, असं राऊत म्हणाले. त्यांनी न्यायालयावर दबाव आणला, न्यायमूर्तींना घरी बोलावून दम देण्यात आला, हे काम फडणवीस आणि त्यांच्या टोळीने केलं, असा आरोपही राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत, असे टीकास्त्रस त्यांनी सोडलं.

राजीनामा कसला देता, लोकांनीच तुम्हाला घरी पाठवलंय

या सगळ्याचा उद्रेक कुठेतरी होतोचं. लोकांचा जेवढा मोदी-शहांवर राग नाही, तेवढा फडणवीसांवर आहे. विदर्भात काय झालं पहा ना, विदर्भात नितीन गडकरी यांची जागा सोडली, तर भाजपा हा रसातळाला गेला, याला जबाबादार फडणवीस आहेत. ते राजीनामा कसला देतायत, लोकांनीच त्यांना घरी पाठवलं आहे. महाराष्ट्रात जे जातीचं, धर्माचं, सुडाचं राजकारण त्यांनी सुरू केलं आणि एक चांगलं राज्य रसाताळाला नेलं, अशा शब्दांत राऊत यांनी फडणवीसांवर हल्ला चढवला.

आमच्यावर कारवा करण्यापेक्षा, लोकांच्या घरात घुसण्यापेक्षा तुमच्या घरात काय चाललंय ते आधी बघा, असा सल्लाही राऊत यांनी दिला. भविष्यात कारवाया आम्हालाही करता येतील, एवढे पुरावे आमच्याकडेही आहेत, असा सज्जड इशारा राऊतांनी दिला. कालपर्यंत मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, दोन पक्ष फोडून येईन असं म्हणत होतात. जे दोन पक्ष तुम्ही फोडले, त्या दोन पक्षांनीच तुम्हाला जाहीरपणे अश्रू ढाळण्याची वेळ आणली हे विसरू नका, अशा शब्दांत राऊतांनी टीकास्त्र डागलं.

Follow Us
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना..
पंतप्रधानांच्या नेदरलँड दौऱ्यात 17 करारांवर स्वाक्षऱ्या, सामान्यांना...
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा.
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला
मोदींना लिहिलेल्या पत्रावरून खोत- पडळकरांचा पवारांना खोचक टोला.
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे
मोठी बातमी! डॉलरच्या तुलनेत रुपया ऐतिहासिक निच्चांकीवर, धक्कादायक आकडे.
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,
पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड, नंतर 15...असह्य वेदनेने महिला ओरडत राहिली,.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर.
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत....
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप.