Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ तीन भागातून भरभरुन मतदानामुळे अनिल देसाईंनी पलटवली बाजी, दिग्गज राहुल शेवाळेंना बसला धक्का

South Central Mumbai lok sabha Election Final Result 2024 : दक्षिण मध्य मुंबईतून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्यासाठी विजय सोपा मानला जात होता. पण प्रत्यक्षात घडलं उलटच. फारशी ओळख नसलेले अनिल देसाई विनर ठरले. हे कसं शक्य झालं? देसाईंच्या विजयाला काय कारण ठरली? जाणून घ्या.

'या' तीन भागातून भरभरुन मतदानामुळे अनिल देसाईंनी पलटवली बाजी, दिग्गज राहुल शेवाळेंना बसला धक्का
Anil Desai Image Credit source: ani
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 3:35 PM

लोकसभा निवडणूक 2024 चे निकाल काल जाहीर झाले. दक्षिण मध्य मुंबईतून धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यात सामना होता. राहुल शेवाळे हे 2014 पासून या लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. अनिल देसाई हे दोन टर्मपासून राज्य सभेवर खासदार आहेत. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे. 2022 मध्ये शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं. त्यावेळी राहुल शेवाळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. राहुल शेवाळे यांच्यासाठी तुलनेने ही सोपी लढाई मानली जात होती. मागच्या दोन टर्मपासून राहुल शेवाळे खासदार होते. मतदारसंघात त्यांचा तगडा जनसंपर्क होता. तुलनेने अनिल देसाई यांचा चेहरा मतदारसंघात फार ओळखीचा नव्हता. जनसंपर्क तेवढा नव्हता. राहुल शेवाळे हे खासदार होण्याआधी नगरसेवक होते. त्यामुळे राहुल शेवाळे हे सहज विजयी होतील असा अंदाज होता.

दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आमदार आहेत. चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर आमदार आहेत. धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत. सायन कोळीवाड्यातून भाजपाचे कॅप्टन तामिळ सेल्वन आमदार आहेत. वडाळ्यामधून भाजपाचे कालिदास कोळंबकर आणि माहिममधून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आमदार आहेत. या लोकसभा क्षेत्रात महायुतीचे चार आणि मविआचे दोन आमदार होते. पक्षीय बलाबलमध्ये राहुल शेवाळे यांची बाजू वरचढ होती. पण तरीही ते हरले.

‘या’ तीन भागातून ठाकरे गटाला सर्वाधिक मतदान

राहुल शेवाळे यांच्यासाठी पहिल्या फेरीची मतमोजणी समाधानकारक होती. त्यांना 20,420 मत मिळाली होती. अनिल देसाई यांना 18,807 मत मिळाली होती. पण दुपार होईपर्यंत अनिल देसाई यांची आघाडी 50 हजारपर्यंत गेली. शेवाळे यांच्या पराभवाच चित्र स्पष्ट होत गेलं. माहिम विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 57.97% टक्के मतदान झालं होतं. वडाळ्यातून 57.11% मतदान झालेलं. धारावीमधून सर्वात कमी 48.52% टक्के मतदान झालेलं. अणुशक्ती नगर, चेंबूर आणि धारावी या तीन भागातून अनिल देसाई यांना सर्वाधिक मतदान झालं.

युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?
प्रियकराच्या घरी जाऊन तरुणीची आत्महत्या, जालना भोकरदनमध्ये घडलं काय?.
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत
हिंदीच भाषा घेतली पाहिजे याची सक्ती नाही - मंत्री उदय सामंत.