AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: दोघं भाऊ एकत्र आले, कोणता तीर मारला?, 16 तारखेला… देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान काय?

Devendra Fadnavis: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच tv9 मराठीचे मॅनेजिंग एटिडर उमेश कुमावत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी ठाकरे बंधूच्या युतीबाबात सूचक विधाने केले.

Devendra Fadnavis: दोघं भाऊ एकत्र आले, कोणता तीर मारला?, 16 तारखेला... देवेंद्र फडणवीस यांचं सूचक विधान काय?
Devendra fadnavisImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 12, 2026 | 12:59 PM
Share

राज्यात महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. या निवडणुकीला तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार हा अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची tv9 मराठीचे मॅनेजिंग एटिडर उमेश कुमावत यांना मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि UBT गटाचे उद्धव ठाकरे यांच्या युतीवर भाष्य केले आहे. ते आता काय म्हणाले चला जाणून घेऊया…

या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 66 बिनविरोध जागा निवडून आल्या त्यावर वक्तव्य केले. ते म्हणाले, फक्त आमचे आले हे म्हणणं चुकीचं आहे. अपक्ष आणि इस्लामिक पार्टीचाही आला. अपक्षाची काय ताकद असते. पण तोही आला ना. किरीट सोमय्यांचे सुपुत्र नील सोमय्यांच्या विरुद्ध काँग्रेसने उमेदवार नाही दिला,. उबाठाने नाही दिला. शरद पवारांनी नाही दिला. अपक्ष उमेदवार त्यांच्या पुढे आहे. अनेक ठिकाणी त्यांना उमेदवार नाही सापडले. याचं उदाहरण कल्याण डोंबिवली आहे. कल्याण डोंबिवलीत आमचे मागच्यावेळी १०५ निवडून आले. आमची शक्ती वाढली. उद्दव ठाकरेंची शिवसेना ही एकनाथ शिंदेंकडे आली. त्यांच्याकडे नेतेच राहिले नाही.

“दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं”

पुढे ते म्हणाले की, आम्ही आघाडी केल्यावर महापालिका वनसाईड झाली. दुसऱ्या पक्षांचं अस्तित्व संपलं. अनेक वॉर्डात यांना उमेदवारच मिळाले नाही. जर उमेदवार देणार नसतील तर आम्ही स्वत आणून उभे करायचे का. भारताच्या लोकसभेत ३५ खासदार बिनविरोध गेले. त्यातील ३२ काँग्रेसच्या काळात गेले. पहिल्या तीन निवडणुकीचं सोडून द्या. आताचं आहे. मागच्या निवडणुकीत गेले. लोकसभेत बिनविरोध जाऊ शकतात. तर महापालिकेत का जाऊ शकत नाही. मुंबई नाशिकच्या बाहेर हे प्रचाराला गेले सांगा. दीड दोन वर्षात कोणत्या भागात जाऊन यांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं. आपण हरलो तर ब्रँड राहणार नाही. म्हणून घराबाहेर पडले नाही. दोघे एकत्र आले तर कोणता तीर मारला. १६ तारखेला दिसेल ना काय झालं ते.

“सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल”

मुलाखतीमध्ये पुढे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूच्या युतीवर देखील वक्तव्य केले. ‘आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्यासोबत स्पेस नाही. जेव्हा आले तेव्हा हिंदुत्व घेतलं होतं. आता त्यांनी हिंदुत्व सोडून दिलं. त्यांनी जुनीच भूमिका घेतली. त्यांनी मराठी माणसाबद्दल बोलले तर हरकत नाही. पण रिक्षावाल्यांना मार, टॅक्सीवाल्यांना मार हे काही आम्हाला जमणार नाही. त्यांचं आणि आमचं जमलं नाही. ते काही आमचे शत्रू नाही. ते पुढेही मित्रच राहतील. पण या निवडणुकीत त्यांची आणि आमची वैचारिक लढाई आहे. मी मित्र म्हणून नाही राजकीय निरीक्षक म्हणून सांगतो. सर्वात मोठं नुकसान राज ठाकरेंना होईल.’

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...