AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2019मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यात शरद पवार यांचा हात; दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांना मशाल गीतातून जय भवानी शब्द काढायला निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. आता उद्धव ठाकरे यांच्याकडे हिंदुत्वाच्या गमजा मारायला काय राहील? असा सवाल करतानाच आमची हिंदूची व्याख्या धर्मावर आधारीत नाही, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

2019मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यात शरद पवार यांचा हात; दीपक केसरकर यांचा गौप्यस्फोट
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 21, 2024 | 6:32 PM
Share

राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. 2019मध्ये राज्यात काठावर सरकार आलं होतं. तेव्हा राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्यात शरद पवार यांचा हात होता, असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. एक प्रादेशिक पक्ष कमी झाल्याशिवाय दुसरा प्रादेशिक पक्ष वाढत नाही, हे समीकरण शरद पवारांनी महाराष्ट्रात राबवलं. मात्र उद्धव ठाकरे त्यांची लाचारी करतात हे योग्य नाही, असा हल्ला दीपक केसरकर यांनी चढवला आहे.

दीपक केसरकर हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. 2014मध्ये मागितला नसताना देखील शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला आणि शिवसेनेची ताकद संपवली. 2017 मध्ये भाजप सोबत सरकार स्थापन करण्याची बोलणी केली, यावेळी मोदींनी राष्ट्रवादी सरकारमध्ये आली तरी चालले, मात्र शिवसेना आमच्या सोबत सरकारमध्ये राहील, असं म्हटलं होतं. याला मोदी म्हणतात. मात्र शरद पवारांनी शिवसेना सत्तेत असेल तर आम्ही सत्तेत सहभागी होणार नाही, असं सांगितलं होतं. शरद पवार एवढा द्वेष शिवसेनेचा करत होते. त्यामुळे शिवसेना फोडली गेली, असा दावा दीपक केसरकर यांनी केला.

ते प्रती मुख्यमंत्री म्हणून वावरत होते

कोकणात ज्या ज्या नेत्यांची सत्ता येते, त्या त्या नेत्यांना मंत्रिपद मिळतात. नारायण राणे यांना कोकणातील प्रतिनिधी म्हणून मानाचे स्थान दिल्लीमध्ये मिळालं. मात्र आमच्या खासदारांना कोणी ओळखत नाही. ते प्रती मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात वावरत होते, असा टोला केसरकर यांनी ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांना लगावला. कोकणातील जो जो खासदार होतो, तो केंद्रात मंत्री होतो. नारायण राणे निवडून आल्यानंतर केंद्रात मंत्री होतील. राणेंना कोकणचा वाघ म्हणून ओळखलं जातं. नारायण राणे यांची कोकणचा नेता म्हणून प्रतिमा आहे, अशी स्तुती सुमनंही दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर उधळली.

राणेंची महाराष्ट्रावर पकड

महाराष्ट्रात शिवसेना सोडून गेलेलं नेते पुन्हा आमदार झाले नाहीत. मात्र नारायण राणे यांनी स्वतःसह 11 आमदारांचे राजीनामे देऊन त्यांना पुन्हा निवडून आणून दाखवले. यातून राणेंची कोकणावर आणि महाराष्ट्रावर किती पकड आहे हे दाखवून दिलं. नारायण राणे हे एक आक्रमक नेतृत्व आहे. त्यांच्यावर व्यक्तिगत पातळीवर टीका करायची आणि त्यांना राग आला की त्यांच्या तोंडून चुकीचं वाक्य निघालं की त्यांचं भांडवल करायचं ही विरोधकांची रणनीती आहे, असंही ते म्हणाले.

गमजा मारायला काय राहील?

जय भवानी शब्द मशालगीत मधून वगळण्याची निवडणूक आयोगाने उबाठाला नोटीस दिली, यावर उद्धव ठाकरे यांनी कारवाई केली तरी चालले परंतु वगळणार नाही अशी भूमिका घेतली आहे. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदुत्त्वाच्या गमजा मारायला उद्धव ठाकरे यांच्याकडे काय राहील? आमची हिंदूंची व्याख्या धर्मावर आधारित नाही. देशात विकासाची लाट असताना राज्यात केवळ भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असं केसरकर म्हणाले.

Follow Us
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तप
सर्वोच्च न्यायालयाची NTA ला वरंवार पेपरफुटीप्रकरणी कडक ताकीद, उपाययोजनांची तपासणी
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड