AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Elections 2022: निवडणूक रॅली, सभांवरील मनाई कायम राहणार?; आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा

उत्तर प्रदेश आणि पंजाबसहीत पाच राज्यांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होत आहेत. निवडणूक आयोगाने या पाचही राज्यातील निवडणुकांची घोषणा करताना 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणूक रॅली आणि सभांना मनाई केली होती.

Assembly Elections 2022: निवडणूक रॅली, सभांवरील मनाई कायम राहणार?; आज निवडणूक आयोग करणार मोठी घोषणा
Election commission
| Edited By: | Updated on: Jan 15, 2022 | 10:31 AM
Share

नवी दिल्ली: उत्तर प्रदेश आणि पंजाबसहीत पाच राज्यांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होत आहेत. निवडणूक आयोगाने या पाचही राज्यातील निवडणुकांची घोषणा करताना 15 जानेवारीपर्यंत सर्व प्रकारच्या निवडणूक रॅली आणि सभांना मनाई केली होती. केवळ व्हर्च्युअल रॅलीला परवानगी देण्यात आली होती. आज निवडणूक आयोग याबाबतचा आढावा घेणार आहे. त्यामुळे पाचही राज्यातील रॅली आणि सभांना निवडणूक आयोग परवानगी देणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूक रॅली आणि सभांना मनाई केली होती. मात्र, व्हर्च्युअल कॅम्पेनला परवानगी दिली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्वच राजकीय पक्षांना पदयात्रा काढण्यास, सायकल रॅली आणि रोड शो करण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

डिजीटल माध्यमातून प्रचार करा

दरम्यान, निवडणूक आयोग कोरोना व्हायरस आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रकोप पाहूनच निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. शुक्रवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन डिजीटल माध्यमातून प्रचार करण्याचं आवाहन केलं होतं. दूरदर्शनवरून प्रचार करण्यासाठी राजकीय पक्षांना दुप्पट वेळ दिला जाणार असल्याचंही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं.

निवडणूक आयोगाचे कान, डोळे बना

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पर्यवेक्षकांनाही काही सूचना केल्या होत्या. निवडणूक आयोगाचे कान आणि डोळे बनून पर्यवेक्षकांनी काम करावं. लोकांच्या संपर्कात राहा, निष्पक्ष आणि नैतिक राहा, अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मतदारांना निवडणुकीत प्रलोभनं दिली जातात. हे प्रकार रोखण्यासाठी स्वत:च्या कल्पना राबवा, अशा सूचनाही निवडणूक आयोगाने पर्यवेक्षकांना दिल्या आहेत.

कोणत्या राज्यात किती टप्प्यात निवडणुका

उत्तर प्रदेशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेशात 10,14, 20, 23, 27 फेब्रुवारी, 3 आणि 7 मार्च रोजी मतदान होणार आहे. पंजाबमध्ये एकाच टप्प्यात म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उत्तराखंडमध्येही एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. उत्तराखंडमध्येही 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. गोव्यातही एका टप्प्यात म्हणजे 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मणिपूरमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च रोजी मतदान होणार आहे. या सर्व राज्यांमध्ये 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

संबंधित बातम्या:

Corona Cases India : देशात 2 लाख 68 हजार नवे कोरोना रुग्ण, वाढत्या मृत्यूच्या संख्येनं टेन्शन वाढलं

जबरदस्त! भारताचा चीनला ‘दे धक्का’, घातक ‘ब्रह्मोस’ मिसाइल देणार ‘या’ देशाला, 2770 कोटींची डील

पत्रकार कमाल खान यांना अनोखी श्रद्धांजली, वाराणसीतील आजची गंगा आरती खान यांना समर्पित

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.