AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

’60-70 कैद्यांसोबत एकाच खोलीत…’, सलमान खानने सांगितले तुरुंगातील वास्तव, सोहेल खान भावूक

'त्या दिवसांची आठवण आजही विसरू शकत नाही' बॉलिवूड अभिनेता सलमान खानने 'अलायन्स'मध्ये सांगितला तुरुंगातील अनुभव. ऐकताच सोहेल खान झाला भावूक.

'60-70 कैद्यांसोबत एकाच खोलीत...', सलमान खानने सांगितले तुरुंगातील वास्तव, सोहेल खान भावूक
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 03, 2026 | 5:26 PM
Share

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान नुकताच प्राइम व्हिडिओवरील रिअॅलिटी शो ‘अलायन्स’मध्ये विशेष पाहुणा म्हणून सहभागी झाला. या शोमध्ये तो स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या आपल्या धाकट्या भावाला अभिनेता सोहेल खानला पाठिंबा देण्यासाठी आला होता. सलमानची अनपेक्षित एन्ट्री पाहून शोमधील इतर स्पर्धक आश्चर्यचकित झाले. मात्र, या भेटीदरम्यान सलमानने केवळ सोहेलला प्रोत्साहनच दिले नाही तर आपल्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाची आठवणही सर्वांसमोर मांडली.

शोमध्ये संवाद साधताना सलमान खानने 1998 मधील काळवीट आणि चिंकारा शिकार प्रकरणानंतर तुरुंगात घालवलेल्या दिवसांविषयी सांगितले. त्या काळातील परिस्थिती किती कठीण होती, याचे भावनिक वर्णन त्याने केले. तो म्हणाला की, ‘खूप वर्षांपूर्वी जेव्हा मी तुरुंगात गेलो होतो, तेव्हा समोर फक्त लोखंडी गज दिसायचे. अतिशय लहान जागेत तब्बल 50 ते 70 कैदी राहत होते. संपूर्ण बॅरकमध्ये फक्त एकच भारतीय शैलीतील शौचालय होते. सर्वत्र पाल फिरायच्या आणि परिस्थिती अत्यंत अस्वच्छ होती.’

जेलमधील 18 दिवस

सलमानच्या या अनुभवांबद्दल ऐकताना शोमधील स्पर्धक आणि त्याचा भाऊ सोहेल खान भावूक झाले. काही क्षण संपूर्ण वातावरण शांत झाले होते. सलमानच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगाची माहिती ऐकून उपस्थितांनाही धक्का बसला.

सलमान खान याला 1998 मधील काळवीट आणि चिंकारा शिकार प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणात त्याने पोलिस कोठडी आणि तुरुंगात मिळून सुमारे 18 दिवस घालवले होते. यापूर्वी एका दूरचित्रवाणी मुलाखतीतही त्याने तुरुंगातील अनुभव सांगताना, ‘तुरुंगात सर्वात मोठी अडचण बाथरूमची होती. त्याशिवाय मी शांत राहायचो, कारण मी कोणतेही चुकीचे कृत्य केले नसल्याची माझी भावना होती असे त्याने म्हटले होते.

भावाला पाहताच सोहेल खान भावूक

दरम्यान, ‘अलायन्स’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन अभिनेता कुणाल खेमू करत आहे. या शोमध्ये चित्रपट, दूरदर्शन, डिजिटल माध्यम आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्ती विविध आव्हानांचा सामना करताना दिसतात. स्पर्धकांना एकमेकांसोबत युती करून खेळ पुढे न्यावा लागतो ही या शोची खास संकल्पना आहे.

सलमान खानच्या उपस्थितीमुळे शोला विशेष रंगत आली. भावाला पाहताच सोहेल खान भावूक झाला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारत प्रेम व्यक्त केले. या भावनिक क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Follow Us
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत
मोठी बातमी! Gen Z बाबत सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोठा निर्णय; मुंबईत तब्बल 2000...
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडे
माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं की...; पंकजा मुंडेंनंतर आता धनंजय मुंडेंचंही मोठं विधान
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते...
मोठी उलथापालथ! वाशिममध्ये भाजपचा मविआला जबर धक्का, अनेक नेते, पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाने खळबळ!
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी...
धनंजय मुंडेंच्या निवृत्तीच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंची फटकेबाजी, म्हणाले मराठ्यांच्या नादी ...
CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व...
मोठा दिलासा! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्या; कोर्टाचे सर्व राज्यांना आदेश
पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधाना
पंकजा मुंडे खरंच मोठा राजकीय निर्णय घेणार? करुणा मुंडेंच्या एका विधानानेच उडवली खळबळ
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले
शिंदेंनंतर आता सुनेत्रा पवारांनी घेतली मंत्र्यांची शाळा! थेट आदेश दिले अन्... रडारवर कोणता मंत्री?
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय पकडले अन्...
गडकरींच्या निवासस्थानाबाहेर मोठा गोंधळ, पोलिसांनी हात पाय धरले अन्... नागपूरात मोठ्या घडामोडी
नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
Girish Mahajan | नाशिकच्या पालकमंत्रीपदावर गिरीश महाजन यांचं सूचक विधान, म्हणाले...
जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर...
मोठी बातमी! जनतेच्या पैशाची उधळपट्टी चालणार नाही; इनोव्हा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांचा दणका