AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटानंतर मुलाला विसरला आमिर खान? पूर्व पत्नी किरण म्हणाली “शाळेविषयी त्याला काहीच..”

अभिनेता आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एकल पालकत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. आमिरला मुलाच्या शाळेविषयी काहीच माहीत नसल्याचं तिने सांगितलं आहे.

घटस्फोटानंतर मुलाला विसरला आमिर खान? पूर्व पत्नी किरण म्हणाली शाळेविषयी त्याला काहीच..
किरण राव, आमिर खान, आझादImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 03, 2024 | 10:37 AM
Share

अभिनेता आमिर खान आणि किरण राव हे 2021 मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतर मुलगा आझादचं संगोपन दोघं मिळून करत आहेत. मात्र व्यग्र वेळापत्रकामुळे मुलांना फारसा वेळ देता येत नसल्याची खंत त्याने वारंवार मुलाखतींमध्ये बोलून दाखवली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत किरण याविषीय मोकळेपणे व्यक्त झाली. “आमिरला आझादच्या शाळेविषयी कोणतीच माहिती नाही”, असा खुलासा किरणने केला. कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी आमिरने चित्रपटांमधून ब्रेक घेतला आहे. मात्र त्याच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणं अजूनही कठीण जात असल्याचं किरणने सांगितलं आहे.

करीना कपूरच्या ‘व्हॉट वुमेन वॉन्ट’ या चॅट शोमध्ये किरण म्हणाली, “हे अजूनही खूप गुंतागुंतीचं आहे. आमिर फार बिझी असतो. प्रामाणिकपणे बोलायचं झाल्यास, घटस्फोटाच्या आधीही पालकांच्या सर्व जबाबदाऱ्या मी एकटी खंबीरपणे पार पाडत होती. मात्र घटस्फोटानंतर आमिरला या गोष्टीची जाणीव झाली आहे की आता त्यालासुद्धा आझादसाठी पुरेसा वेळ काढावा लागणार आहे. कारण जेव्हा तुम्ही एकत्र असता, तेव्हा बऱ्याच गोष्टी मॅनेज होतात. पण विभक्त झाल्यानंतर तुम्हाला बऱ्याच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.”

“आझादचं संगोपन करणं आता अधिक सोपं झालं आहे, कारण आमिरसुद्धा त्यात तितकाच सहभागी असतो. आम्ही एकाच इमारतीत वर-खाली राहतो. आझादलाही आता त्याच्या वडिलांसोबत वेळ घालवायला आवडतंय. आधी हे सगळं खूप अवघड होतं. आता मी आझादला आमिरसोबत सोडून निवांत राहू शकते. पण आमिरला त्याच्या शाळेविषयी कोणतीच माहिती नाही. माझ्या मते ही वडिलांची सर्वसामान्य समस्या असते. मुलाच्या शाळेच्या बाबतीत कोणत्या गोष्टी मला सांगू नकोस, बाकी सगळं मी हाताळेन, असं त्याचं म्हणणं असतं”, अशा शब्दांत किरण व्यक्त झाली.

घटस्फोटानंतर एकल पालकत्वात येणाऱ्या समस्यांविषयी बोलताना किरण पुढे म्हणाली, “आझाद खूप चांगला मुलगा आहे. आम्ही दोघं एकमेकांना खूप चांगल्याप्रकारे ओळखतो. एकल पालकत्वातही तुम्ही तुमच्या मुलासोबत खूप चांगलं नातं निर्माण करू शकता. आम्ही एकमेकांची सपोर्ट सिस्टीम आहोत. जेव्हा कधी मी निराश असते, तेव्हा त्याच्यासोबत जरा वेळ घालवला तरी मला बरं वाटतं. त्याची विनोदबुद्धीही खूप चांगली आहे. तो मला खूप हसवतो. एकल मातृत्वात ठळकपणे जाणवणारी एकच गोष्ट म्हणजे, तुम्हाला जेव्हा स्वत:साठी ब्रेक हवा असतो, तेव्हा तुम्हाला तो मिळेलच असं नाही. दुसरा पालक व्यग्र असेल तर गोष्टी अवघड होतात. सुदैवाने माझे आईवडील यात माझी मदत करतात.” आमिर खान आणि किरण राव यांनी 2005 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या 16 वर्षांनंतर ते विभक्त झाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.