AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘झोपली नाही तर…’, संचिता उगलेने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

'झोपली नाही तर तुझ्या जागेवर दुसऱ्या अभिनेत्रीला संधी देईल', अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर टीव्ही अभिनेत्री इंडस्ट्रीवर भडकली. केला मोठा खुलासा.

'झोपली नाही तर...', संचिता उगलेने टोकाचं पाऊल उचलल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा
| Updated on: Jun 15, 2026 | 5:32 PM
Share

टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने अनेक कलाकारांना धक्का बसला असून आता अभिनेत्री आंचल खुराणाने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांवर भाष्य केले आहे.

आंचल खुरानाने आपल्या पोस्टमध्ये मनोरंजन क्षेत्रातील वास्तव मांडताना म्हटले की, प्रेक्षकांना मनोरंजन हवे असते, वाहिन्यांना टीआरपी हवी असते आणि निर्मात्यांना खर्च कमी ठेवायचा असतो. मात्र या सगळ्यात कलाकारांवर कोणत्या प्रकारचा मानसिक आणि व्यावसायिक ताण येतो याकडे फारसे लक्ष दिले जात नाही.

तिच्या मते, अनेकदा कलाकारांना छोट्या-छोट्या कारणांवरून प्रकल्पातून बाहेर केले जाते. ज्यामध्ये झोपली नाही तर प्रोजेक्टमधून काढून टाकेन. त्यांच्या जागी दुसऱ्या कलाकाराची निवड केली जाते. अशा परिस्थितीमुळे कलाकारांवर मोठा मानसिक ताण निर्माण होऊ शकतो.

ऑडिशन्स, नकार आणि अस्थिर करिअर

आंचलने अभिनय क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरणाचाही उल्लेख केला. तिने सांगितले की, अनेक कलाकार दररोज ऑडिशन्स देतात आणि सतत नकाराचा सामना करतात. बाहेरून आकर्षक दिसणाऱ्या या क्षेत्रात करिअरची अनिश्चितता, कामाची अस्थिरता आणि भविष्यासंबंधीची चिंता अनेक कलाकारांना सतावत असते.

तिच्या म्हणण्यानुसार, लोक कलाकारांना ‘मजबूत राहा’ असा सल्ला देतात; मात्र सततच्या संघर्षाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम अनेकदा दुर्लक्षित राहतो.

‘कॅमेऱ्यासमोर हसणारा कलाकार आतून तुटलेला असू शकतो’

आंचलने स्वतःच्या अनुभवांचाही उल्लेख केला. तिने सांगितले की, आयुष्यात असा काळ आला होता जेव्हा ती तणाव आणि नैराश्याचा सामना करत होती. अशा वेळी बाहेरून सर्व काही सुरळीत दिसत असले तरी कलाकारांच्या मनात मोठे वादळ सुरू असू शकते.

तिने कलाकारांना आवाहन केले की, कोणतीही परिस्थिती कितीही कठीण वाटली तरी टोकाचे पाऊल उचलू नये. गरज वाटल्यास कुटुंबीय, मित्र किंवा विश्वासू व्यक्तींचा आधार घ्यावा आणि स्वतःला वेळ द्यावा.

संचिता उगलेच्या मृत्यूची चौकशी सुरू

दरम्यान, संचिता उगलेच्या निधनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. तिच्या निधनाच्या बातमीने चाहते, सहकलाकार आणि संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

Follow Us
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण; थेट व्हिडीओ आला समोर, पहा...
मोठी बातमी! अभिजीत दिपकेंना मारहाण; थेट व्हिडीओ आला समोर, पहा...
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत
Sudhir Mungantiwar On Thackeray | ऑपरेशन टायगरचा मोठा धमाका? ठाकरे गटातील खासदार दिल्लीत; फुटीच्या चर्चांनी राजकारण तापलं!
अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट... ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा
अचानक नाही, आधीपासूनच तयारी; थेट... ठाकरे गटातील फुटीबाबत विश्लेषकांचा मोठा दावा
पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला....
Maharashtra Monsoon Session | पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला विरोधक घेरणार!
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा
अखेर तेच घडलं! ...म्हणून नेते बैठकीला गैरहजर; ठाकरेंचा पक्षात पुन्हा फूट पडणार? काही खासदार थेट...
मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा नवा अल्टिमेटम, 1.40 लाख नोंदी सापडल्या तरी...सरकारवर आता पुन्हा दबाव!
महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप
Kalyan | महावितरण अधिकाऱ्यांवर बांगड्या फेकत शिवसेनेचा संताप; स्मार्ट मीटरवरून कल्याणमध्ये हल्लाबोल!