AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईतील करोडोंचं घर, संपत्ती सोडून हा बॉलिवूड सुपरस्टार जंगलात राहायाला गेला; म्हणाला, ‘मला स्टारडमची भीती…’

असा एक प्रसिद्ध अभिनेता जो मुंबईतील आपलं करोडोंचं घर, संपत्ती सोडून, बॉलिवूडचं ग्लॅमर सोडून थेट जंगलात राहायला आला आहे. यामागील नेमकं कारण काय आहे आणि हा अभिनेता कोण आहे ते पाहूया.

मुंबईतील करोडोंचं घर, संपत्ती सोडून हा बॉलिवूड सुपरस्टार जंगलात राहायाला गेला; म्हणाला, 'मला स्टारडमची भीती...'
abhay deol Image Credit source: instagram
| Updated on: Apr 08, 2025 | 11:01 AM
Share

बॉलिवूडमध्ये प्रत्येकाला आपली एक खास ओळखं निर्माण करायची असते. त्यानुसार सगळेच प्रयत्न करतात. स्टारडम आणि ग्लॅमर आयुष्य जगायला प्रत्येक सेलिब्रिटीला आवडतं. प्रत्येक अभिनेत्याला जास्तीत जास्त लोकप्रियता मिळवायची असते. पण असा एक अभिनेता आहे ज्याने हे बॉलिवूडचं झगमगत जग सोडून एक वेगळाच मार्ग अवलंबला आहे. या अभिनेत्याला चित्रपट पार्श्वभूमी असूनही, स्टारडमपासून दूर राहायचे होते.

अभिनेता सरळ जंगलात राहायला गेला आहे.

त्यासाठी या अभिनेत्याने अनेकदा लांब जाण्याचाही प्रयत्न केला. एकदा तर हा अभिनेता परदेशात पळून गेला होता. पण आता या अभिनेत्याने जी जागा निवडली ती फारच वेगळी आहे. ती जागा कोणतं शहर नाही, किंवा कोणता देश नाही तर हा अभिनेता सरळ जंगलात राहायला गेला आहे. होय, आपलं सगळं प्रसिद्धच साम्राज्य सोडून हा अभिनेता जंगलात राहतोय. अभिनेत्याने स्वतः सांगितले की त्याला मुंबईत राहायचे नाही, म्हणून तो जंगलात राहायला गेला आहे. यामागील कारण काय आहे आणि हा अभिनेता कोण आहे जाणून घेऊयात.

मुंबई शहर सोडून गोव्याच्या जंगलात राहत आहे

हा अभिनेता अभय देओल. हा सनी देओल आणि बॉबी देओलचा चुलत भाऊ आहे. अभयची बॉलिवूड कारकीर्द खूप मोठी आहे. त्याने अनेक हीट चित्र पट दिले आहेत. पण त्याला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते. अभयने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये सांगितले की तो काही दिवसांपूर्वीपासून मुंबई शहर सोडून गोव्याच्या जंगलात राहत आहे. अभय म्हणाला, ‘मी गोव्याच्या जंगलात राहतो, मला ताजी हवा मिळते, मी खूप शिस्तप्रिय आहे. माझ्यासाठी ताजी हवा महत्त्वाची आहे. तिथे राहून मी थोडा वेडा झालोय”

मी निसर्गाशी थोडेसे जोडला गेलो आहे 

तो पुढे म्हणाला, ‘माझ्याकडे कोणताही नॉन-स्टिक पॅन नाही. मी कोणत्याही बियांच्या तेलात स्वयंपाक करत नाही. मी एक खास फिल्टर विकत घेतला आहे. आता, जेव्हा मी बाहेर जेवतो तेव्हा मला प्रश्न पडतो की त्यांनी कोणत्या प्रकारचे तेल वापरले असेल? तूप होते की नव्हते, खोबरेल तेल होते का, तव्यावर काही ओरखडे होते का? मी निसर्गाशी थोडेसे जोडला गेलो आहे.”

View this post on Instagram

A post shared by Abhay Deol (@abhaydeol)

अभयला प्रसिद्ध होण्याची भीती वाटते

त्याच वेळी, जेव्हा अभय देओलला मुंबईबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला “मी इथे जन्मलो आणि इथेच खूप काळ जगलो आहे. आता तो काळ गेला आहे जेव्हा तुम्हाला FOMO वाटायचं. जेव्हा मी माझ्या जवळच्या व्यक्तीच्या समारंभाला उपस्थित राहू शकत नाही तेव्हाच मला हे जाणवते” असं म्हणत त्याने मुंबईपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं. अभयला आधीच प्रसिद्धीत राहणे आवडत नाही. उलट अभयला प्रसिद्ध होण्याची भीती वाटत होती. जेव्हा त्याचा ‘देव डी’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याला माहित होते की हा चित्रपट हिट होईल आणि स्टारडमच्या भीतीने तो न्यू यॉर्कला गेलेला. आणि आता त्याने स्विकारलेल्या या मार्गामुळे तर सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.