AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांना आता अभिषेकनेच दिली हवा

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर अशी एक पोस्ट लाईक केली आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही पोस्ट घटस्फोटाशी संंबंधित होती. अनेक वर्षे एकत्र राहिल्यानंतर जोडपे घटस्फोटाला कसे सामोरे जातात, याविषयीचा हा लेख होता.

ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांना आता अभिषेकनेच दिली हवा
ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 18, 2024 | 9:52 AM
Share

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून आहेत. मात्र त्यावर अद्याप दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या एण्ट्रीनेही नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. अशातच अभिषेकने इन्स्टाग्रामवरील एक पोस्ट लाईक केली आहे. ही पोस्ट घटस्फोटाशी संबंधित आहे. एका पत्रकाराने सोशल मीडियावर घटस्फोटासंबंधिची पोस्ट शेअर केली होती. त्यात ‘इंडियन इक्स्प्रेस’च्या ‘आय मॅगझिन’मधील लेख होता. ‘जेव्हा प्रेम सोपं होणं थांबतं,’ असं त्या पोस्टवर लिहिलेलं होतं. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये घटस्फोटाविषयी भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या. हीच पोस्ट आता अभिषेकने लाईक केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, ‘घटस्फोट कुणासाठीही सोपा नसतो. वृद्ध जोडप्यांना हात धरून रस्ता ओलांडतानाचे व्हिडीओ पाहून ते क्षण आपणसुद्धा कधीतरी अनुभवावेत असं कोणाला वाटत नाही किंवा ‘हॅपिली एव्हर आफ्टर’ची (आयुष्यभर आनंदाने जगावं) स्वप्नं कोण पाहत नाहीत? तरीसुद्धा आयुष्य कधीकधी आपल्या अपेक्षेप्रमाणे उलगडत नाही. पण अनेक दशकं एकत्र राहिल्यानंतर, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनल्यानंतर आणि अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी एकत्र अनुभवल्यानंतर, एकमेकांवर बराच काळ अवलंबून राहिल्यानंतर लोक घटस्फोटाचा सामना कसा करतात?’ अभिषेकने हीच पोस्ट लाईक केली आहे.

ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा असतानाच अंबानींच्या कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेकने वेगवेगळी एण्ट्री केली होती. एकीकडे अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता नंदा, नव्या नंदा, अभिषेक बच्चन, अगस्त्य नंदा हे सर्वजण एकत्र आले होते. तर फक्त ऐश्वर्या आणि आराध्या हे नंतर आले. किमान अभिषेकने तरी त्या दोघींसोबत यायला हवं होतं, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी दिले होते. बच्चन कुटुंबीय आणि ऐश्वर्या यांच्यात नक्कीच काही आलबेल नाही, अशाही चर्चा होत्या.

2007 मध्ये ऐश्वर्याने अभिषेक बच्चनशी लग्न केलं. ‘गुरू’ या चित्रपटाच्या सेटवर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांच्या लग्नाला आता जवळपास 16 वर्षे झाली आहेत. या दोघांना आराध्या ही मुलगी आहे. ऐश्वर्या आणि अभिषेकची पहिली भेट 2000 मध्ये ‘ढाई अक्षर प्रेम के’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण