AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल विचारताच अभिषेकची अशी प्रतिक्रिया; रितेशने थेट पायच धरले

अभिषेक बच्चनने रितेश देशमुखच्या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याला ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारला असता त्याने दिलेलं उत्तर ऐकून रितेशने थेट अभिषेकचे पायच धरले.

ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल विचारताच अभिषेकची अशी प्रतिक्रिया; रितेशने थेट पायच धरले
Abhishek, Aishwarya and Riteish DeshmukhImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 1:30 PM

गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या जोरदार चर्चा आहेत. मात्र त्यावर दोघांनी अद्याप कोणतीच थेट प्रतिक्रिया दिली नाही. या चर्चांदरम्यान आता अभिषेक आणि ऐश्वर्याचं वैवाहिक आयुष्य पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे. यामागचं कारण म्हणजे अभिषेकला नुकत्याच एका कार्यक्रमात विचारण्यात आलेला प्रश्न. त्याने रितेश देशमुखच्या ‘केस तो बनता ही है’ या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रितेशने त्याला ऐश्वर्यासोबत दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच अभिषेक गालातल्या गालात हसू लागला.

या शोमध्ये रितेशने आधी बच्चन कुटुंबातील नावांबद्दल प्रश्न विचारला. “अमिताभजी, ऐश्वर्या, आराध्या आणि तू अभिषेक. या सर्व नावांची सुरुवात अ या अक्षराने होते. मग जया आंटी आणि श्वेता यांचीच नावं अशी वेगळी का”, असा सवाल रितेशने अभिषेकला केला. त्यावर अभिषेक हसत म्हणाला, “हा प्रश्न तुला त्यांनाच विचारावा लागेल. पण माझ्या मते आमच्या घरात ही प्रथाच झाली आहे. अभिषेक, आराध्या..” त्याने आपलं म्हणणं पूर्ण करण्याआधीच रितेश थांबवत पुढे म्हणतो, “आराध्यानंतर?” तेव्हा अभिषेक उत्तर देतो, “नाही, आता पुढची पिढी येईल तेव्हा पाहुयात ना.”

हे सुद्धा वाचा

अभिषेकचं उत्तर ऐकल्यानंतर रितेश त्याला दुसऱ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल प्रश्न विचारतो. हा प्रश्न ऐकल्यानंतर अभिषेक गालातल्या गालातच हसू लागतो. तरीही हास्यावर नियंत्रण आणून तो रितेशला म्हणतो, “वयाचा विचार कर जरा, रितेश. मी तुझ्यापेक्षा मोठा आहे.” हे ऐकल्यानंतर रितेश लगेचच अभिषेकच्या पाया पडू लागतो. या दोघांमधील हा मजेशीर संवाद सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्न केलं. त्यांची मुलगी आराध्या नुकतीच 13 वर्षांची झाली आहे. अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला अभिषेक आणि ऐश्वर्याने वेगवेगळी एण्ट्री केल्यापासून दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना अधिक उधाण आलं आहे. या लग्नाला अभिषेक संपूर्ण बच्चन कुटुंबीयांसह पोहोचला होता. तर ऐश्वर्या आणि आराध्या नंतर दोघीच आल्या होत्या. मात्र नुकत्याच एका हाय प्रोफाइल लग्न समारंभातील फोटो व्हायरल झाल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या एकत्रच असल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये दोघं एकत्र झळकत आहेत.

अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी.
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न
भेदरलेल्या पाकिस्तानचा भारतावर निर्बंध लादण्याचा पोरकट प्रयत्न.
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल
.. मग स्थानिक यंत्रणेकडे कशी नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल.
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत
जगात एकच मानव धर्म आहे, त्यालाच हिंदू धर्म म्हणतात - मोहन भागवत.
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.