AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेंद्र मोदींच्या आवाहनावर अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पंचनामा’

संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं (Kartik Aaryan video viral) आहे.

नरेंद्र मोदींच्या आवाहनावर अभिनेता कार्तिक आर्यनचा 'पंचनामा'
| Edited By: | Updated on: Mar 20, 2020 | 9:47 AM
Share

मुंबई : संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं (Kartik Aaryan video viral) आहे. काल (19 मार्च) संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी मोदींनी महत्त्वाचे मुद्दे नगारिकांसोबत शेअर केले. मोदींच्या या मुद्द्यांवरुन अभिनेता कार्तिक आर्यनने नागिरकांना घरात बसण्याचे आवाहन केले आहे. कार्तिकचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर (Kartik Aaryan video viral) होत आहे.

या व्हिडीओमध्ये कार्तिकने सर्व नागिरकांना घरी बसण्याचे आवाहन करत आहे. त्यासोबत जे सरकराने सांगितल्या प्रमाणे पालन करत नाही, त्यांनाही कार्तिकने घरी बसण्याची विनंती केली आहे. जे लोक वर्क फ्रॉम करत नाहीत, तसेच काही लोक वर्क फ्रॉम होमचा गैरफायदा घेत आहेत, अशा कर्मचाऱ्यांची खरडपट्टीही कार्तिकने काढली. अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या चाहत्यांना मोंदीनी दिलेली माहिती शेअर करत आहेत.

“सुरक्षित राहा. आपल्यालाही सुरक्षा करावी लागेल. तेव्हाच त्या व्हायरसचा आपण खात्मा करु शकतो. इटलीच्या लोकांनी एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, सुरुवातीला आम्ही खूप चुका केल्या होत्या आणि आज अशी परिस्थिती आली की आम्हाला या व्हायरसवर कंट्रोल करता येत नाही”, असं कार्तिकने त्या व्हिडीओमध्ये सांगितले.

‘प्यार का पंचनामा’ सिनेमात कार्तिक आर्यनचा डायलॉग गाजला होता. त्याच स्टाईलमध्ये कार्तिकने मोदींच्या आवाहनाला जोरदार पाठिंबा दर्शवला आहे

बॉलिवूड इंडस्ट्रीही कोरोनासोबत लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. बऱ्याच मोठ्या चित्रपट आणि कार्यक्रमांची शूटिंग रद्द करण्यात आली आहे. स्टार्स सलग आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. कारण अनेक कलाकार आता आपल्या घरी वेळ घालवत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (19 मार्च) जनता कर्फ्यूची घोषणा केली. देशभरात येत्या रविवारी म्हणजेच 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू लागू करणार असल्याचं मोदी म्हणाले. हा कर्फ्यू सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री 8 वाजता संपूर्ण देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.