AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकेकाळी ऐश्वर्या रायला टक्कर द्यायची ही अभिनेत्री, आता बॉलिवूड सोडून संन्यास घेतला; जगते असे आयुष्य

बॉलिवूडमध्ये स्टारडम मिळवून सर्व काही सोडून वेगळी दुनिया निर्माण करणे सोपे नाही. पण आज आपण अशा एका अभिनेत्री विषयी बोलणार आहोत, जिने लग्झरी आयुष्य सोडून संन्यासी जीवन स्वीकारले. कोण आहे ही अभिनेत्री? चला, जाणून घेऊया.

एकेकाळी ऐश्वर्या रायला टक्कर द्यायची ही अभिनेत्री, आता बॉलिवूड सोडून संन्यास घेतला; जगते असे आयुष्य
Barkha MadanImage Credit source: Social Media
| Updated on: May 16, 2025 | 12:32 PM
Share

बॉलिवूडमधील अभिनेत्री ग्लॅमरस जीवन जगतात. पडद्यामागील त्यांची दुनिया देखील आलिशान आणि चमकदार जीवनशैलीने परिपूर्ण असते. अशा परिस्थितीत अभिनेत्री सहजासहजी ही जीवनशैली सोडू शकत नाहीत. पण आज आपण अशा एका अभिनेत्रीची गोष्ट सांगणार आहोत, जिने स्वतःच्या इच्छेने केवळ ग्लॅमरस जीवनच सोडले नाही, तर शोबिझच्या दुनियेलाही रामराम करून एक वेगळा मार्ग निवडला. याचा विचार करणेही अवघड आहे. हा मार्ग आहे धर्म आणि अध्यात्माचा. ग्लॅमर पूर्णपणे सोडून ही अभिनेत्री संन्यासी बनली आणि चित्रपटसृष्टीकडे पाठ फिरवून डोंगरांमध्ये वास्तव्य करू लागली. आता तुम्ही विचार करत असाल, ही कोण आहे? चला, तिची ओळख करून देतो.

या चित्रपटाने केली करिअरची सुरुवात

या अभिनेत्रीचे नाव आहे बरखा मदन. तिने १९९६ मध्ये ‘खिलाडियों का खिलाडी’ या अ‍ॅक्शन चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अक्षय कुमार, रेखा आणि रविना टंडन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला. पण बरखाने पुढची महत्त्वाची भूमिका मिळण्यासाठी सात वर्षे वाट पाहावी लागली. २००३ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘भूत’ या हॉरर चित्रपटात तिने मंजीत खोसला ही भयानक भूमिका साकारली. तिच्या या भूमिकेने समीक्षक आणि प्रेक्षक दोघांवरही चांगली छाप सोडली. अजय देवगन, उर्मिला मातोंडकर, नाना पाटेकर, रेखा, फरदीन खान आणि तनुजा यांसारख्या दिग्गज कलाकारांमध्ये बरखाने भूमिका साकारल्या. वाचा: मधुचंद्राच्या रात्रीची तयारी, पत्नी म्हणाली थांब आलेच; मग घेऊन आली दूध, पतीचा बदलला मूड अन्…

या टीव्ही मालिकांमध्ये केले काम

‘खिलाडियों का खिलाडी’ आणि ‘भूत’ या टीव्ही मालिकांमध्ये बरखा दिसली होती. यामध्ये सामाजिक नाटक ‘न्याय’ आणि ऐतिहासिक मालिका ‘१८५७ क्रांति’ यांचा समावेश आहे. त्यात ती राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत दिसली होती. ‘भूत’ नंतर तिला हव्या त्या भूमिका मिळाल्या नाहीत, तेव्हा तिने पुन्हा टेलिव्हिजनपासून ब्रेक घेतला. २००५ ते २००९ या काळात ती झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘सात फेरे – सलोनी का सफर’ मध्ये दिसली. या मालिकेत राजश्री ठाकुर आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत होते. २०१० मध्ये बरखा यांनी निर्माती बनण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिभावान स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना पाठिंबा देण्यासाठी गोल्डन गेट एलएलसीची स्थापना केली. त्यांनी ‘सोच लो’ आणि ‘सुर्खाब’ या दोन चित्रपटांची निर्मिती केली आणि अभिनयही केला. दलाई लामा यांच्या आयुष्यभराच्या अनुयायी असलेल्या बरखा यांनी २०१२ मध्ये बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला. गेल्या १३ वर्षांपासून त्या चित्रपटसृष्टीपासून दूर संन्यासी जीवन जगत आहेत. त्यांचा बहुतांश वेळ हिमाचल आणि लडाखमध्ये जातो.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.