AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

220 कोटींचा चित्रपट, खोट्या मिशीमुळे झाला फ्लॉप?; 4 वर्षांनंतर सुपरस्टारने मागितली माफी

बॉलिवूडच्या या सुपरस्टारचा चार वर्षांपूर्वी बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाला होता. तब्बल 220 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला होता. आता चार वर्षांनंतर या अभिनेत्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे.

220 कोटींचा चित्रपट, खोट्या मिशीमुळे झाला फ्लॉप?; 4 वर्षांनंतर सुपरस्टारने मागितली माफी
बॉलिवूड सुपरस्टारImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 23, 2026 | 12:31 PM
Share

एखाद्या चित्रपटावर खूप मोठा बजेट खर्च केला जातो, त्यात सुपरस्टारला कास्ट केलं जातं. ऐतिहासिक कथानक आणि भव्यता दाखवून तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरेल, अशी अपेक्षा केली जाते. परंतु ऐतिहासिक कथानक साकारताना काही गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिलं नाही तर चांगलंच महागात पडू शकतं, याचा विचार निर्मात्यांकडून खूप उशिरा केला जातो. असाच एक चित्रपट चार वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. तब्बल 220 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटात हिरोने खोटी मिशी लावली होती. त्यामुळे मोठा वाद झाला होता. कारण हिरोने साकारलेली भूमिका ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची होती. आता चार वर्षांनंतर अभिनेत्याने या चुकीसाठी प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आहे. ज्या चित्रपटाबद्दल आम्ही इथे बोलत आहोत, त्याचं नाव आहे ‘सम्राट पृथ्वीराज’. यामध्ये अभिनेता अक्षय कुमारने पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली होती.

अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘भूत बंगला’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत त्याला ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या चित्रपटात अक्षयने खोटी मिशी लावल्यामुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेसाठी त्याला मिशी वाढवण्याची गरज होती. परंतु ते शक्य न झाल्याने त्याने खोटी मिशी लावली होती. याविषयी अक्षय म्हणाला, “त्या कथेच्या हिशोबाने एका विशिष्ट प्रकारच्या मिशीची गरज होती. आता मी तर तशी मिशी उगवू शकत नाही. जर कोणाला ती गोष्ट आवडली नसेल तर मी माफी मागतो.”

यावेळी अक्षयने हे स्पष्ट केलं की फिल्म मेकिंगदरम्यान काही निर्णयांना टाळणं कठीण असतं. अक्षय वर्षातून दोन ते तीन चित्रपट करतो. त्यामुळे त्याचं शेड्युल वर्षभर व्यस्त असतं. एकाच वेळी विविध चित्रपटांमध्ये काम करावं लागल्याने प्रत्येक भूमिकेनुसार मोठं फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करणं खूप कठीण होऊन जातं. यामुळे सर्वसाधारणपणे मेकअप, प्रोस्थेटिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स यांच्या मदतीने वेगवेगळे लूक साकारले जातात.

‘सम्राट पृथ्वीराज’ हा बिग बजेट चित्रपट होता. तो बनवण्यासाठी निर्मात्यांनी तब्बल 220 कोटी रुपये खर्च केले होते. परंतु बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने फक्त 90 कोटी रुपये कमावले होते. यामधील अक्षयचा लूक आणि त्याने साकारलेली भूमिका चोख नसल्याची तक्रार प्रेक्षकांनी केली होती.

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.