AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉसच्या घरात गर्लफ्रेंडशी लग्न करण्याचा अभिनेत्याचा पश्चात्ताप; म्हणाला “स्वत:लाच चाबकाने मारून घ्यावंसं..”

घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर 2016 मध्ये अलीने अनम मर्चंटशी लग्न केलं. मात्र त्याचं दुसरं लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये त्याने अनमलाही घटस्फोट दिला. दुसऱ्या लग्नाविषयी त्याने सांगितलं, "ते आमचं अरेज्ड मॅरेज होतं. या लग्नातसुद्धा एकमेकांच्या पसंत-नापसंतीविषयी बरेच मतभेद होते."

बिग बॉसच्या घरात गर्लफ्रेंडशी लग्न करण्याचा अभिनेत्याचा पश्चात्ताप; म्हणाला स्वत:लाच चाबकाने मारून घ्यावंसं..
Ali Merchant, Sara KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 16, 2023 | 3:52 PM
Share

मुंबई : अभिनेता आणि डीजे अली मर्चंटला बिग बॉस या शोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. 2011 मध्ये बिग बॉसच्या चौथ्या सिझनमध्ये त्याने भाग घेतला होता. विशेष म्हणजे हे सिझन बिग बॉसच्या घरातील एका लग्नामुळे गाजलं होतं. अली मर्चंटने प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खानशी बिग बॉसच्या घरात लग्न केलं होतं. मात्र त्याच्या काही महिन्यांनंतर लगेचच दोघांचा घटस्फोट झाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने सारा खानशी लग्न करण्याचा पश्चात्ताप होत असल्याचं म्हटलं आहे. “आज मी जेव्हा त्या क्षणांचा विचार करतो, तर मला स्वत:लाच चाबकाने मारून घ्यावंसं वाटतं”, असं वक्तव्य अली मर्चंटने केलं आहे.

लग्नाविषयी तो पुढे म्हणाला, “ती सर्वांत मूर्खपणाची गोष्ट होती. त्या नात्यात एकमेकांविषयी समजुतदारपणा नव्हता, सामंजस्य नव्हतं. आम्ही एकमेकांविषयी नीट विचार न करताच लग्नबंधनात अडकलो होतो. शो संपल्यानंतर लगेचंच आम्हीसुद्धा विभक्त झालो. कारण लग्नाचा निर्णयच आम्ही खूप घाईत घेतला होता. 2011 याच वर्षी आम्ही घटस्फोट घेतला.”

घटस्फोटाच्या पाच वर्षांनंतर 2016 मध्ये अलीने अनम मर्चंटशी लग्न केलं. मात्र त्याचं दुसरं लग्नसुद्धा फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये त्याने अनमलाही घटस्फोट दिला. दुसऱ्या लग्नाविषयी त्याने सांगितलं, “ते आमचं अरेज्ड मॅरेज होतं. या लग्नातसुद्धा एकमेकांच्या पसंत-नापसंतीविषयी बरेच मतभेद होते. त्याचवेळी मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत होतो, मात्र आर्थिक समस्या वारंवार उद्भवत होत्या. त्यामुळे आम्ही दोघांनी एकमेकांच्या समंतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.”

View this post on Instagram

A post shared by Sara Khan (@ssarakhan)

दोन घटस्फोटानंतरही अली मर्चंटने आयुष्यात जोडीदार असावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. “प्रत्येकाला साथीदाराची गरज असते. सध्या मी माझ्या करिअरमध्ये चांगलं काम करतोय. अभिनेत्यासोबत मी डीजेसुद्धा आहे. त्याचसोबत मी संगीत निर्मातासुद्धा झालोय. आता मला अशा एका रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे, जिथे मी आणि माझी पार्टनर एकमेकांना समजून घेऊ शकू. आमच्यात चांगला संवाद असेल”, असं तो म्हणाला.

गेल्या काही वर्षांत अली मर्चंटने ओटीटीवरही काम केलं. ‘लिबास’ या वेब सीरिजमध्ये तो नुकताच झळकला होता. टीव्ही मालिकांपेक्षा वेब सीरिजमध्ये काम करायला आवडत असल्याचं त्याने स्पष्ट केलं. त्याने आतापर्यंत ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा’, ‘बंदिनी’, ‘आहट’ आणि ‘शपथ’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके