AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक बदलतात, रडणं व्यर्थ..; रात्री 12 वाजता अमिताभ बच्चन यांची पोस्ट, चाहते पडले पेचात

बॉलिवूडचे शहनशाह अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परंतु त्यांची ही पोस्ट वाचून नेटकरी पेचात पडले आहेत. रात्री बारा वाजता त्यांनी हा ब्लॉग पोस्ट केला आहे.

लोक बदलतात, रडणं व्यर्थ..; रात्री 12 वाजता अमिताभ बच्चन यांची पोस्ट, चाहते पडले पेचात
अमिताभ बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 25, 2025 | 3:28 PM
Share

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते विविध पोस्ट लिहितच असतात. त्याचसोबत ते ब्लॉगमध्येही आमचे विचार मोकळेपणे मांडतात. 83 वर्षीय बिग बी एकवेळ आयुष्यात इतर गोष्टी विसरतील, परंतु नियमित ब्लॉग लिहायला कधीच विसरत नाहीत. नुकत्याच एका ब्लॉगमध्ये त्यांनी त्यांच्या भावना मोकळेपणे मांडल्या आहेत. परंतु त्यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर चाहते पेचात पडले आहेत. अमिताभ बच्चन यांनी इतका दु:खद संदेश का लिहिला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. बिग बींनी बदलती वेळ आणि वेळेनुसार बदलत्या लोकांबद्दल ही खास पोस्ट लिहिली आहे.

या ब्लॉगची सुरुवात त्यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींसोबत केलीये. ‘तुमने हमें पूज पूज कर पत्थर कर डाला, वो जो हम पर जुमले कसते हैं , हमें जिंदा तो समझते हैं’ (माझी पूजा करून तू मला दगड बनवलंस. जे माझी थट्टा करतात, त्यांना किमान मी जिवंत तरी वाटतो). या ब्लॉगमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘वेळ बदलते, जग बदलतं, वागणूक, सवयी बदलतात, संस्कृती बदलते, लोक बदलतात. जी लोकं तेव्हा होती, ती आता नाहीत आणि आता लवकरच जी लोकं आता आहेत, ती तेव्हाचे संदर्भ बनतील.’

भूतकाळात जगणं निरर्थक आहे आणि भूतकाळ फक्त आठवणी म्हणून जपलं पाहिजे, असंही त्यांनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिलंय. त्यानंतर त्यांनी पुन्हा हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींचा उल्लेख करत त्या ओळी आजही प्रासंगिक असल्याचं म्हटलंय.

याआधीही त्यांनी एक्स अकाऊंटवर ‘निकाल दिया’ अशी पोस्ट लिहिली होती. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘अभिषेकने तुम्हाला घराबाहेर काढून टाकलं का’, असा प्रश्न एकाने विचारला होता. तर ‘जया बच्चन यांच्यासोबत का भांडण केलं’, असं दुसऱ्याने म्हटलं होतं. यावरून काही नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्ससुद्धा शेअर केले. ‘जयाजींची माफी मागून घ्या, कदाचित पुन्हा बोलावून घेतील’ अशी मस्करी नेटकऱ्यांनी केली होती.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.