AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक बदलतात, रडणं व्यर्थ..; रात्री 12 वाजता अमिताभ बच्चन यांची पोस्ट, चाहते पडले पेचात

बॉलिवूडचे शहनशाह अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परंतु त्यांची ही पोस्ट वाचून नेटकरी पेचात पडले आहेत. रात्री बारा वाजता त्यांनी हा ब्लॉग पोस्ट केला आहे.

लोक बदलतात, रडणं व्यर्थ..; रात्री 12 वाजता अमिताभ बच्चन यांची पोस्ट, चाहते पडले पेचात
अमिताभ बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 25, 2025 | 3:28 PM
Share

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर ते विविध पोस्ट लिहितच असतात. त्याचसोबत ते ब्लॉगमध्येही आमचे विचार मोकळेपणे मांडतात. 83 वर्षीय बिग बी एकवेळ आयुष्यात इतर गोष्टी विसरतील, परंतु नियमित ब्लॉग लिहायला कधीच विसरत नाहीत. नुकत्याच एका ब्लॉगमध्ये त्यांनी त्यांच्या भावना मोकळेपणे मांडल्या आहेत. परंतु त्यांचा हा ब्लॉग वाचल्यानंतर चाहते पेचात पडले आहेत. अमिताभ बच्चन यांनी इतका दु:खद संदेश का लिहिला, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. बिग बींनी बदलती वेळ आणि वेळेनुसार बदलत्या लोकांबद्दल ही खास पोस्ट लिहिली आहे.

या ब्लॉगची सुरुवात त्यांनी वडील हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींसोबत केलीये. ‘तुमने हमें पूज पूज कर पत्थर कर डाला, वो जो हम पर जुमले कसते हैं , हमें जिंदा तो समझते हैं’ (माझी पूजा करून तू मला दगड बनवलंस. जे माझी थट्टा करतात, त्यांना किमान मी जिवंत तरी वाटतो). या ब्लॉगमध्ये त्यांनी पुढे लिहिलं, ‘वेळ बदलते, जग बदलतं, वागणूक, सवयी बदलतात, संस्कृती बदलते, लोक बदलतात. जी लोकं तेव्हा होती, ती आता नाहीत आणि आता लवकरच जी लोकं आता आहेत, ती तेव्हाचे संदर्भ बनतील.’

भूतकाळात जगणं निरर्थक आहे आणि भूतकाळ फक्त आठवणी म्हणून जपलं पाहिजे, असंही त्यांनी ब्लॉगमध्ये पुढे लिहिलंय. त्यानंतर त्यांनी पुन्हा हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळींचा उल्लेख करत त्या ओळी आजही प्रासंगिक असल्याचं म्हटलंय.

याआधीही त्यांनी एक्स अकाऊंटवर ‘निकाल दिया’ अशी पोस्ट लिहिली होती. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘अभिषेकने तुम्हाला घराबाहेर काढून टाकलं का’, असा प्रश्न एकाने विचारला होता. तर ‘जया बच्चन यांच्यासोबत का भांडण केलं’, असं दुसऱ्याने म्हटलं होतं. यावरून काही नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्ससुद्धा शेअर केले. ‘जयाजींची माफी मागून घ्या, कदाचित पुन्हा बोलावून घेतील’ अशी मस्करी नेटकऱ्यांनी केली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...