AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पोटगीसाठी सर्वकाही सुरु…’, बिग बींनी लेकीला दिला बंगला, अभिषेक – ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण?

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय हिला पोटगी द्यावी लागेल म्हणून अमिताभ बच्चन यांनी घेतला निर्णय? अभिषेक - ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण? बच्चन कुटुंब गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत... सोशल मीडियावर फक्त अभिषेक - ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा..

'पोटगीसाठी सर्वकाही सुरु...', बिग बींनी लेकीला दिला बंगला, अभिषेक - ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण?
| Updated on: Nov 27, 2023 | 8:59 AM
Share

मुंबई : 27 नोव्हेंबर 2023 | बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी लेक श्वेता नंदा हिच्या नावावर ‘प्रतीक्षा’ बंगला केला आहे. ज्यामुळे सर्वत्र तुफान चर्चा रंगल्या आहे. एकीकडे अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे बिग बी यांनी लेक श्वेता नंदा हिच्या नावावर ‘प्रतीक्षा’ बंगला केला आहे.. दरम्यान, ‘ऐश्वर्या हिने घटस्फोट घेतल्यास पोटगीसाठी सर्वकाही सुरु आहे…’ असं नेटकरी म्हणत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

अमिताभ बच्चन यांचा ‘प्रतीक्षा’ बंगला…

‘प्रतीक्षा’ बंगल्यात बिग बी त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांच्यासोबत राहायचे. मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी त्यांचा प्रतीक्षा बंगला त्यांची मुलगी श्वेता हिला भेट म्हणून दिला आहे. बंगला लेकीच्या नावावर करण्यासाठी बिग बी यांनी 50.65 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याची माहिती मिळत आहे.

मुंबईतील जुहू येथे अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ या बंगल्याची किंमत 50.63 कोटी रुपये आहे. दरम्यान, एका मुलाखतीत अमिताभ बच्चन यांनी संपत्तीबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. संपत्तीची वाटणी दोन्ही मुलांमध्ये करेल… असं बिग बी म्हणाले होते. अमिताभ बच्चन यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे.

अभिषेक – ऐश्वर्या यांच्या नात्यावर नेटकरी म्हणतात…

ऐश्वर्याने अभिषेकपासून घटस्फोट घेऊन पोटगी मागेल, म्हणून बिग बी त्यांच्या संपत्तीची वाटणी करण्याचा प्रयत्न करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. एक युजर कमेंट करत म्हणाला, ‘घटस्फोट झाला ती ऐश्वर्या काहीही घेणार नाही.’ रंगणाऱ्या चर्चांवर अभिषेक – ऐश्वर्या यांच्याशिवाय बच्चन कुटुंबातील सदस्यांनी देखील यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

सोशल मीडियावर कायम ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट होत असतात.ऐश्वर्या देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. पण ऐश्वर्या आता पती अभिषेक याच्यासोबत एकही फोटो पोस्ट करत नाही. आराध्या हिच्या वाढदिवसासाठी देखील अभिनेत्रीने स्वतःसोबत लेकीचा फोटो पोस्ट केला होता.

ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.