AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रागाच्या भरात मर्यादा विसरलो..’; अनुराग कश्यपचा ब्राह्मण समाजाला माफीनामा

अनुराग कश्यपने सोशल मीडियावर पोस्ट लिहित ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या एका आक्षेपार्ह टिप्पणीवरून वाद सुरू आहे. या टिप्पणीबद्दल त्याने समाजाची माफी मागितली आहे.

'रागाच्या भरात मर्यादा विसरलो..'; अनुराग कश्यपचा ब्राह्मण समाजाला माफीनामा
Anurag KashyapImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 22, 2025 | 12:42 PM
Share

दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे. इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहित त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला आहे. ‘रागाच्या भरात मी माफी मर्यादा विसरलो आणि ब्राह्मण समाजाला बरंवाईट म्हणालो’, असं त्याने लिहिलंय. अनुरागने सोशल मीडियावर एका ट्रोलरला उत्तर देताना ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर अनेकांकडून त्याच्यावर जोरदार टीका झाली. इतकंच नव्हे तर मुंबई पोलीस आयुक्तांकडे त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याता आली होती. ब्राह्मणांबद्दलच्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर अनुरागने याआधीही माफी मागितली होती. परंतु आता पुन्हा एकदा त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अनुराग कश्यपची पोस्ट-

‘मी रागाच्या भरात एकाला उत्तर देताना माझी मर्यादा विसरलो आणि संपूर्ण ब्राह्मण समाजाला वाईट म्हणालो. असा समाज, ज्याचे लोक माझ्या आयुष्यात कायम राहिले आहेत, आजसुद्धा आहे आणि त्यांचं माझ्या आयुष्यात बरंच योगदान आहे. आज ते सर्वजण माझ्यामुळे दुखावले गेले. माझे कुटुंबीयसुद्धा माझ्याने दुखावले आहेत. अनेक बुद्धिजीवी लोक, ज्यांचा मी आदर करतो ते माझ्या रागाने आणि माझ्या बोलण्याच्या पद्धतीने दुखावले आहेत. मी स्वत: तसं वक्तव्य करून स्वत:च्याच मुद्द्यावरून भरकटलो’, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.

त्याने पुढे म्हटलंय, ‘मी या समाजाची मनापासून माफी मागतो, ज्यांना मला तसं म्हणायचं नव्हतं. परंतु रागाच्या भरात एकाच्या घाणेरड्या टिप्पणीचं उत्तर देताना मी तसं लिहिलं. मी माझ्या सर्व मित्रांची, माझ्या कुटुंबीयांची आणि त्या समाजाची, माझ्या बोलण्याच्या पद्धतीसाठी, अभद्र भाषेसाठी माफी मागतो. यापुढे असं पुन्हा होणार नाही, यावर मी काम करेन. माझ्या रागावर काम करेन आणि एखाद्या मुद्द्याबद्दल बोलायचं असेल तर योग्य शब्दांचा वापर करेन. तुम्ही मला माफ कराल अशी आशा आहे.’

अनुराग कश्यपच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. ‘मी माफी मागतो. परंतु ही माफी मी माझ्या पोस्टसाठी नाही तर त्या एका ओळीसाठी मागतोय, ज्याला चुकीच्या पद्धतीने समजलं गेलं आणि द्वेष पसरवला गेला. कोणतंही ॲक्शन किंवा भाषण हे तुमच्या मुलगी, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि ओळखीच्या व्यक्तींपेक्षा मोठं नाही. त्यांना बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. जे स्वत:ला संस्कारी म्हणवतात, तीच लोकं हे सर्व करत आहेत,” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं होतं.

Follow Us
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच..
परभणीतील गोदावरी नदीपात्राला नाल्याचं रुप, नागरिकांकडून सांडपाण्यतच...
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात
निवडणूक आयोग पत्र प्रकरणात पार्थ पवार मैदानात.
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा
पुण्यात अवकाळी पावसाचा जोर; ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना.
नाशिक हादरलं, स्कूल व्हॅन चालकाचं काळं कृत्य समोर, 9 अल्पवयीन मुलींना..
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून धनगर समाजाचे आंदोलन.
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो
अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, थेट रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं नाव समो.
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान
लातूरमध्ये अवकाळीचा मोठा फटका, वादळी वाऱ्यासह गारपीठमुळे मोठं नुकसान.
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले
महिलेची तक्रार येताच कोर्टाने विचारलं... भोंदू खरातने हातच जोडले.
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला...
प्रफुल पटेलांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवारांचा नकार; निवडणूक आयोगाला....
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण...
भोंदू अशोक खरातला कोर्टात व्हीसीद्वारे हजर करणार, कारण....