AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिग्दर्शक अनुराग कश्यपचा मुंबई अन् बॉलिवूड सोडण्याचा निर्णय; नव्या दिशेने वाटचाल

अनुराग कश्यपने मुंबई आणि सोबतच बॉलिवूड सोडण्याचाही निर्णय घेतला आहे. त्याने हा निर्णय फार विचारपूर्वक घेतल्याचं म्हटंल आहे. तसेच हा निर्णय घेण्यामागचे बरीच कारणे त्याने सांगितले आहेत.

दिग्दर्शक अनुराग कश्यपचा मुंबई अन् बॉलिवूड सोडण्याचा निर्णय; नव्या दिशेने वाटचाल
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jan 01, 2025 | 5:47 PM
Share

अनुराग कश्यप एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्याने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपचे नाव खूप मोठे आहे. मात्र अनुराग कश्यपच्या एका निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनुरागने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अनुराग कश्यपचा मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा निर्णय

बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपच्या नावाची आणि त्याच्या चित्रपटांची एक वेगळी ओळख आहे. काही काळापासून त्याला बॉलिवूडमध्ये त्याच्या मनासारखे काम करण्याची संधी मिळत नाहीये. यामुळेच अनुरागा मुंबई सोडून साऊथला शिफ्ट होण्याचा निर्णय घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे.

अनुरागने स्वत: याबाबत खुलासा केल आहे. अनुरागला आता साऊथच्या चित्रपटांकडे वळण्याची इच्छा आहे. तसेच त्याला एक अभिनेता म्हणून स्वतःचा शोध घ्यायचा आहे. अनुरागने साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा त्याचा अनुभव बॉलिवूडपेक्षा वेगळा असल्याचं म्हटलं आहे. अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत चर्चा केली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याने बॉलिवूडच्या अभिनेत्यांबद्दलही बोलताना दिसला.

बॉलिवूडमधील चित्रपट निर्मितीचा उत्साह संपला

अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, बॉलीवूडमध्ये फक्त बिझनेस आणि मार्जिन बद्दल चर्चा होतात. चित्रपटांची विक्री कशी होईल याचा आधी विचार केला जातो. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्याची मजाच संपते. यामुळेच अनुरागला आता मुंबई सोडून दक्षिणेत स्थायिक व्हायचं आहे. हे सर्व नव्या वर्षात करणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. याउलट साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोक चित्रपट बनवण्यात खूप उत्साही असतात असही त्याने म्हटलं आहे.

अभिनेता उद्योगाला कंटाळा आहे?

अनुराग पुढे मुलाखतीत म्हणाला की, “मी बॉलिवूडला कंटाळला आहे आणि निराश आहे. बॉलिवूडमध्ये काही नवीन करण्याच्या विचार करून मी थकलो आहे. साऊथच्या ‘मंजुम्मेल बॉयज’सारखा चित्रपट बॉलीवूडला बनवता आलेला नाही. बॉलीवूड फक्त साऊथ आणि हॉलिवूडच्या चित्रपटाचे रिमेक बनवतात, त्यातही त्यांना काही नवीन करण्याची तयारी नसते.’अशापद्धतीने त्याने आपली बाजू मांडत बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड त्यांच्यापद्धतीने चित्रपट बनवत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.

स्टार ट्रिटमेंट ही एक समस्या

अनुराग कश्यपनेही बॉलीवूडमधील कलाकारांच्या वागणुकीबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, “हिंदी चित्रपटांतील प्रत्येक अभिनेत्याला स्टार ट्रिटमेंटची गरज असते. पण साऊथ इंडस्ट्रीत असे घडत नाही, तिथे मोठे कलाकारही चित्रपटातील इतरांप्रमाणेच वागतात.’ असेही त्याने सांगितले. दिग्दर्शक अनुराग कश्यपने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटही केले आहेत. आणि ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. पण अनुरागच्या या निर्णयाने त्याचे चाहते नक्कीच नाराज झाले आहेत.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण