AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind Vs Ban T20 World Cup: विराटच्या बॅटिंगवर अनुष्का फिदा, दिली अशी Reaction

विराट कोहलीची रेकॉर्डतोड कामगिरी पाहून अनुष्काने व्यक्त केलं प्रेम

Ind Vs Ban T20 World Cup: विराटच्या बॅटिंगवर अनुष्का फिदा, दिली अशी Reaction
Virat Kohli and Anushka SharmaImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 02, 2022 | 6:10 PM
Share

मुंबई- बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक झळकावलं. विराटने नाबाद 64 धावा केल्या. T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये विराटने आपली जबरदस्त कामगिरी कायम ठेवली आहे. विराटची ही खेळी पाहून त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. मॅचमधील विराटचा फोटो पोस्ट करत तिने प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर विराटचा सामन्यातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर तीन हृदयाचे इमोजी पोस्ट केले आहेत. अर्धशतक झळकावताना विराटने टी 20 वर्ल्ड कपमधला एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो टॉपवर आहे.

अनुष्कासोबतच विराटचे चाहतेसुद्धा सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत आहेत. ट्विटरवर विराट ट्रेंड होऊ लागला आहे. पतीच्या प्रत्येक दमदार कामगिरीवर अनुष्का नेहमीच प्रतिक्रिया देताना, त्याची साथ देताना आणि त्याचं कौतुक करताना दिसते. याआधी जेव्हा भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला, तेव्हासुद्धा अनुष्काने विराटसाठी भावूक पोस्ट लिहिली होती. त्या सामन्यात विराटने नाबाद 82 धावा झळकावल्या होत्या.

विराटने टी- 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये तिसरं अर्धशतक झळकावलं आहे. याआधी नेदरलँडविरुद्धच्या सामान्यात त्याने 62 धावा केल्या होत्या. तर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावा केल्या होत्या.

टी-20 वर्ल्ड कप सुरू झाल्यापासून विराट फॉर्ममध्ये आहे. याला अपवाद फक्त दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना होता. आजच्या सामन्यात केएल राहुल आणि विराटने मिळून डाव सावरला. सेमीफायनलमध्ये प्रवेशाच्या दृष्टीने आजची मॅच टीम इंडियासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील पुढचा प्रवास सुरू ठेवण्यासाठी टीम इंडियाला आज सामना जिंकावाच लागेल. टीम इंडियाने 6 विकेट्स गमावून 184 धावा केल्या आहेत. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक