AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ए. आर. रेहमान – सायरा बानू यांचा घटस्फोट, ’30 वर्ष एकत्र राहू अशी अपेक्षा होती पण…’

AR Rahman And Saira Banu Divorce: '30 वर्ष एकत्र राहू अशी अपेक्षा होती पण...', लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए. आर. रेहमान - सायरा बानू यांचा घटस्फोट, गायकाने व्यक्त केल्या भावना..., सध्या सर्वत्र दोघांच्या घटस्फोटाची चर्चा...

ए. आर. रेहमान - सायरा बानू यांचा घटस्फोट, '30 वर्ष एकत्र राहू अशी अपेक्षा होती पण...'
| Updated on: Nov 20, 2024 | 8:07 AM
Share

AR Rahman And Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. 19 नोव्हेंबर 2024 रोजी वकिलांनी एक निवेदन जारी करत दोघांच्या घटस्फोटाची माहिती दिली आहे. वकील वंदना शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ शिवाय खुद्द ए आर रेहमान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत घटस्फोटाची घोषणा केली आहे.

वंदना शाह यांनी जारी केलेल्या निवदनानुसार, ‘लग्नाच्या अनेक वर्षांनंतर सायरा आणि बानू यांनी विभक्त होण्याचा कठीण निर्णय घेतला आहे.नात्यातील भावनात्मक तणावानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं वकील म्हणाल्या आहे.

घटस्फोटानंतर ए आर रेहमान यांची पोस्ट

एक्सवर (ट्विटर) ए आर रेहमान यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लग्नानंतर 30 वर्ष पूर्ण करू अशी अपेक्षा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अनोखा अंत असतो असं वाटत आहे. तुटलेल्या अंतःकरणाच्या भाराखाली देवाचे सिंहासन देखील हलू शकतं. असं असताना देखील आपण अर्थ शोधत असतो… आमच्या मित्रांनो, आम्ही या नाजूक काळातून जात असताना आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल धन्यवाद.’, ए. आर. रेहमान यांची पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ए आर रेहमान आणि पत्नी सायरा बानू यांचं लग्न आणि मुलं

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न 1995 मध्ये केलं होतं. लग्नानंतर सायरा यांनी तीन मुलांना जन्म दिला. दोन मुली आणि एक मुलगा अशी त्यांची मुलं आहे. त्यांच्या मुलींची नावे खतीजा, रहीमा अशी असून मुलाचं नाव अमीन असं आहे.

सांगायचं झालं तर, सायरा बानो यांनी याआधी एका निवेदनाद्वारे विभक्त होण्याची घोषणा केली होती. दोघेही बराच वेळ या गोष्टीचा विचार करत होते. घाईघाईत कोणताही निर्णय झालेला नाही. सायरा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितलं की, त्या आता हे नातं वाचवू शकत नाही. आणि अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.